शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

बीड जिल्ह्यात दुष्काळ असतानाही बांधकामाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:13 IST

एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देपालिका, नगर पंचायतीचे सर्वांना अभय : सर्वत्र मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतींचे बांधकाम वेगात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीप्रश्न येणाऱ्या काळात गंभीर बनू नये यासाठी उपाययोजना होत असल्या तरी दुसºया बाजूला मात्र बांधकामासाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. नगरपंचायत, नगरपालिकांकडून या बांधकामांना लगाम घालण्यासाठी कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.नगररचना विभागाकडून बांधकामासाठी परवानगी घेणे अपेक्षित असते. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विनापरवाना बांधकाम करणाºयांचे सर्वेक्षण करण्याचे काम संबंधित स्वच्छता निरीक्षकांचे असते. मात्र, त्यांच्याकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. याचा फायदा घेत सर्रासपणे टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही सातत्याने होत असलेली बांधकामे त्वरित थांबवून पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.स्वच्छता निरीक्षकाच्या अहवालाची प्रतीक्षाबीड शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच बांधकामे सुरु आहेत. या बांधकामासाठी परवानगी आहे का ? याची तपासणी करण्याचे काम स्वच्छता निरीक्षकांचे आहे. त्यामुळे त्यांनी याचे सर्वेक्षण करुन अनाधिकृत व पाण्याचा अपव्यय करणारी बांधकामे थांबविण्याची गरज आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई