शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात दुष्काळ असतानाही बांधकामाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:13 IST

एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देपालिका, नगर पंचायतीचे सर्वांना अभय : सर्वत्र मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतींचे बांधकाम वेगात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती, त्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. असे असले तरी आजही टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. दुष्काळचा गवगवा सुरु असतानाही बांधकामाचा सपाटा सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिका व नगरपंचायतींकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडून पाणी आरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीप्रश्न येणाऱ्या काळात गंभीर बनू नये यासाठी उपाययोजना होत असल्या तरी दुसºया बाजूला मात्र बांधकामासाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. नगरपंचायत, नगरपालिकांकडून या बांधकामांना लगाम घालण्यासाठी कसल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.नगररचना विभागाकडून बांधकामासाठी परवानगी घेणे अपेक्षित असते. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विनापरवाना बांधकाम करणाºयांचे सर्वेक्षण करण्याचे काम संबंधित स्वच्छता निरीक्षकांचे असते. मात्र, त्यांच्याकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. याचा फायदा घेत सर्रासपणे टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही सातत्याने होत असलेली बांधकामे त्वरित थांबवून पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.स्वच्छता निरीक्षकाच्या अहवालाची प्रतीक्षाबीड शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच बांधकामे सुरु आहेत. या बांधकामासाठी परवानगी आहे का ? याची तपासणी करण्याचे काम स्वच्छता निरीक्षकांचे आहे. त्यामुळे त्यांनी याचे सर्वेक्षण करुन अनाधिकृत व पाण्याचा अपव्यय करणारी बांधकामे थांबविण्याची गरज आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई