शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बीड शहर अंधारात; आता कचराही दिसेल जागेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:01 IST

बीड : येथील नगर पालिकेत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची ...

ठळक मुद्देबीड पालिका : तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने उपासमारीची वेळ

बीड : येथील नगर पालिकेत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यूत विभागाच्या कर्मचाºयांनी दहा दिवसांपासून काम बंद केल्याने पथदिवे बंद असल्याने शहर अंधारात आहे. आता स्वच्छता विभागाचे कर्मचारीही काम बंद करण्याच्या पावित्र्यात असल्याने शहरातील कचरा जागेवरच दिसणार आहे. पालिकेचा हा गलथान कारभार आता सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरणार असल्याने पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड पालिकेतील कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. पालिकेत कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही. आओ जाओ घर तुम्हारा, अशी काहीसी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. उपजिल्हाधिकारी मिलींद सावंत यांच्याकडे पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्याकडे पालिकेबद्दल विचारणा केल्यावर, आपण निवडणूकीच्या कामात असल्याचे सांगून ते दुर्लक्ष करतात.त्यांना पालिका आणि शहराची कसलीच काळजी नसल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. सावंत यांच्या कामकाजाबद्दल आता सर्वसामान्य आणि पालिका कामगार, कर्मचाºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज शहर घाणीच्या साम्राज्यात आणि अंधारात आहे. त्यांनी लक्ष न दिल्यामुळेच आज कामगार, कर्मंचाºयांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही करून वेतन अदा करावे, आणि बीडकरांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, मागील दोन महिने पालिकेने बील थकविल्याने शहरातील पथदिवे बंद होते. तर आता विद्यूत विभागाच्या १२ कर्मचाºयांचे वेतन थकल्याने त्यांनी पथदिवे चालू, बंद करणे सोडले आहे. त्यामुळे १० दिवसांपासून शहर अंधारात आहे. तर दुसºया बाजूला स्वच्छता विभागातील १७ घंटागाडी चालकांचेही वेतन मिळाले नाही.वारंवार मागणी करूनही त्यांना टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे ते सुद्धा आता काम बंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यासह पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांचेही वेतन थकल्याने संताप व्यक्त होत आहे.या सर्वांचे वेतन तात्काळ अदा करून त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ थांबवावी, अशी मागणी मनविसेचे शैलेष जाधव यांनी केली आहे.दरम्यान, विद्युत विभागाच्या अभियंता कोमल गावंडे यांची भेट न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही. त्यांच्या कर्मचाºयाला विचारणा केली असता, आपण याबद्दल काही बोलू शकत नाही, मॅडमलाच विचारुन घ्या, असे सांगितले. गावंडे यांचा भ्रमणध्वनी नसल्याने उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. स्वच्छता विभागाचे प्रमुख व्ही. टी. तिडके म्हणाले, हा विषय तात्काळ मार्गी लावला जाईल.कामगार, कर्मचाºयांवर दबाववेतन थकले तरी काम करीत रहा, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हणत काही अधिकारी कामगार, कर्मचाºयांवर दबाव आणत आहेत. मात्र काहीजण आता आक्रमक झाले असून कामबंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. वेतन थकल्याने आम्ही कुटूंब कसे चालवायचे, महामानवांची जयंती कशी साजरा करायची? असा सवालही काही कर्मचाºयांनी अधिकाºयांना उपस्थित केला आहे. असे असले तरी अधिकाºयांनी मात्र या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडEmployeeकर्मचारीagitationआंदोलन