शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्राम-मराठा क्रांती संघर्ष मोर्चातर्फे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

बीड : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चा यांच्या वतीने ...

बीड : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चा यांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना देण्यात आले.

मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून आंदोलन केले. आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान देऊनही पदरी निराशाच पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले अशी सार्वत्रिक भावना आहे. याला जबाबदार, राज्य मंत्रिमंडळाच्या मराठाविषयक उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण हेच असल्याने त्यांची तातडीने उपसमितीवरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

नुकत्याच गठीत झालेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावरील सर्वच्या सर्व सदस्य हे मराठाविरोधी असल्याने हा आयोग त्वरित बरखास्त करावा. सारथीसारख्या संस्थेला मोठे पाठबळ देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी रुपयांचे अनुदान देत कर्ज देण्याचा अधिकार देणे, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे वसतिगृहांची निर्मिती करावी, एसबीसीअंतर्गत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना त्वरित नियुक्त्या देणे, अशा एकूण १७ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे समन्वयक भानुदास जाधव, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष किशोर पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, दत्ता गायकवाड, राजेंद्र आमटे, पदाधिकारी व शिवसंग्रामचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकार अपयशी

मराठा समाजाला न्याय देण्याच्या बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत अद्यापही राज्य सरकारने भूमिका जाहीर केलेली नाही, असा आरोप करण्यात आला. पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येने राज्यभर मोर्चे काढले जातील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

020921\02_2_bed_19_02092021_14.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन