शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

बीड जिल्ह्यात धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:42 IST

बीड जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे.

बीड : जिल्ह्यातील ९० प्रकल्पामधील जलसाठा मृतावस्थेत गेला आहे. तसेच १० तलावांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे.

बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम, १२६ लघु असे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ९० प्रकल्पांचा जलसाठा मृतावस्थेत गेला आहे, तर १० प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लकच नाही. माजलगांव, मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर सिंदफणा, बिंदुसरा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, कांबळी, वाण, बोरणा, कुंडलीका, बोधेगाव, सरस्वती, वाघेबाभूळगांव असे १६ लघु प्रकल्प आहेत.

या सर्व प्रकल्पांच्या पाण्यावर शेती व पिण्यासाठी वापर केला जातो. जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमी असल्यामुळे संपूर्ण पाणी हे शेतीसाठी व घरगुती वापरासाठी केला जातो. गत वर्षी पावसाळ््याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात १०८.२ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे संपूर्ण धरणे, तलाव, तळे तुडूंब भरली होती. मात्र, यावर्षीच्या पावसाळ््याच्या सुरुवातीला या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा केवळ ६.६४ टक्के शिल्लक आहे.

जिल्ह्यातील १४४ प्रकल्पाची पाणी क्षमता ११३७ दलघमी आहे. पैकी २९३.५१६ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ५९.२५० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे व पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच अनेक गावांमध्ये सांडपाण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी गावकºयांना पायपीट करावी लागत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा