शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या तरुणाचे शवविच्छेदन औरंगाबाद येथे इन कॅमेरा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:21 IST

नातेवाईकांनी संजयचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देमातंग समाजाला एससी प्रवर्गातील १३  टक्के आरक्षणातूनच लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावेअडीच मिनिटांचा व्हिडिओ; फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधी

बीड : मातंग समाजाला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केज तालुक्यातील संजय ताकतोडे या तरूणाने जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मागणीनूसार आज सकाळी मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात नेण्यात आला आहे.

मातंग समाजाला एससी प्रवर्गातील १३  टक्के आरक्षणातूनच लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ३५ वर्षीय संजय ताकतोडे याने बिंदुसरा तलावात जलसमाधी घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी समोर आली. संजय हा केज तालुक्यातील साळेगाव येथेच दुध डेअरी चालवितो. त्याचा भाऊ हनुमंत हा लहुजी शक्तिसेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. सोमवारी रात्री संजय हा घरातून निघून गेला होता. मंगळवारी सकाळी बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या काठावर व्यायामासाठी गेलेल्या तरूणांना एक बॅग आणि त्यामध्ये मोबाईल सापडला. त्यांनी याची तपासणी केली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेत मृतदेहाची शोध मोहीम हाती घेतली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मृतदेह गळ टाकून बाहेर काढण्यात आला. रूग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रूग्णालयात दुपारच्यावेळी आणला. त्यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही रुग्णालयात आले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रुग्णालयात तगडा बंदोबस्त होता. ग्रामीण ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ, पोउपनि प्रदीप डोलारे, पोह कैलास ठोंबरे, लक्ष्मण जायभाये, आर.एच.भंडाणे, अमोल येळे, सफौ दिनकर एकाळ, शेख खय्यूम आदी कर्मचारी येथे बंदोबस्तावर आहेत. 

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी संजयने स्वता:च्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये त्याने आरक्षणासह विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. जवळपास अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. मोबाईल बॅगमध्ये ठेवून त्याने जलसमाधी घेतली. विशेष म्हणजे मोबाईलच्या कव्हरमध्येही त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये शेवटची आठवण म्हणून हे साहित्य माझ्या कुटूंबियांना द्या, अशी विनंती त्याने चिठ्ठीत केली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. 

नातेवाईकांचा आक्रमक पवित्रासंजयने व्हिडीओमध्ये ज्या मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण कराव्या, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यानंतर नातेवाईकांनी संजयचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. यानुसार शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे आणण्यात आला आहे. 

अडीच मिनिटांचा व्हिडिओ; फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधीसंजयने मृत्यपूर्वी २.२५ सेकंदाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय... जय लहुजी, वंदे मातरम. मी संजय ताकतोडे. फडणवीस सरकार आपणास विनंतीपूर्वक विचारतो की, मातंग समाज कित्येक वर्षापासून स्वतंत्र आरक्षणासाठी लढत आहे. स्वतंत्र आरक्षण म्हणजे आमच्या मातंग समाजाला एससीमध्ये जे काही १३ टक्के आरक्षण आहे. त्या १३ टक्क्यांमधून मातंग समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्या. त्यांच्या मागणीसाठी कित्येक वर्ष झाले. मातंग समाज मोर्चे काढतो, अर्धनग्न मोर्चे काढले, हालगी मोर्चा काढला, आसूड मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये आमच्या समाजाने लाठ्या-काठ्याही खाल्ल्या. तरीही फडणवीस सरकारला आमच्या समाजाविषयी दया, माया का येईना. मातंग समाज भारताच्या किंवा राष्ट्राच्या , गाव संरक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असून व समाजाचे राष्ट्राप्रती प्रेम असून, या मातंग समाजाची का दखल घेतली जात नाही.? आता तर त्याच्यापुढे जाऊन नागपूर ते मुंबई मातंग समाजातील काही समाजसेवकांनी मोटारसायकल महारॅली काढली. त्याच्यापुढे जाऊन मातंग समाजाने फडणवीस सरकार तुमच्या समोर अकोल्यामध्ये लोटांगण घेतलं. यामध्ये लहानथोर, वृद्ध सगळेच होते. अनेकांच्या शरीराचे तर सालटे निघले. एवढे असूनसुद्धा मातंग समाजाची दखल का घेतली जात नाही? मातंग समाज गद्दार आहे का, मातंग समाज देशसेवेसाठी झोकून दिलेला आहे. त्या लहुजी साळवेंनी देशाच्या संरक्षणासाठी प्राणत्याग केला. आयुष्यभर लग्न नाही केल. म्हणून त्या समाजाला असे केले. मुंबईमध्ये अण्णा भाऊ साठेंनी मुंबईसाठी मोर्चे काढले. आंदोलने केले. अण्णा भाऊंनी शाळा शिकून समाज जागृत केला. समाजाला सत्य सांगितले. मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाजप्रबोधन केले, ही मातंग समाजाची चूक आहे का? मातंग समाज फक्त आम्हाला जे १३ टक्के आरक्षण आहे. त्यातली आमच्या लोकसंख्येनुसार आमची भाऊवाटणी भेटावी, याच्यादृष्टीने हे सर्व प्रयत्न करतोय. एवढे करुनही फडणवीस सरकारचे आमच्याविषयी डोळे उघडेनात म्हणून फडणवीस सरकार मी संजय ताकतोडे बीड जिल्हा तालुका केज येथून बोलतो आहे. मी आपल्या सरकारचे, फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधी घेत आहे. आतातरी आमच्या समाजाविषयी प्रेम दाखवा. डोळे उघडा आणि आमच्या समाजाला आमचा हक्क आणि न्याय द्या. हे आपणाला मन:पूर्वक विनंती करतो. जय लहुजी, वंदे मातरम्.

टॅग्स :reservationआरक्षणSuicideआत्महत्याgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीBeedबीड