शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

जेवणाचे भांडण विकोपाला; विळ्याने केला वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:04 IST

पंधरा दिवसांपूर्वी एका प्रार्थना स्थळी झालेले भांडण विकोपाला जाऊन एकाने चौघांवर विळ्याच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : पंधरा दिवसांपूर्वी एका प्रार्थना स्थळी झालेले भांडण विकोपाला जाऊन एकाने चौघांवर विळ्याच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे शनिवारी सायंकाळी घडली. यात चौघे गंभीर जखमी झाले असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.पाटोदा येथील गणेश बळीराम सरवदे, शीतल उर्फ बाबासाहेब काशिनाथ सरवदे, जयपाल रामेश्वर सरवदे आणि प्रताप बळीराम सरवदे हे शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता गणेशच्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावातील प्रमोद लिंबाजी कांबळे (वय ३६) हा तिथे आला. पंधरा दिवसापूर्वी एका प्रार्थनास्थळी जेवणाच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून प्रमोदने गणेशच्या गळ्यावर विळ्याने वार केला. परंतु, गणेशने वार चुकविला मात्र त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. यावेळी गणेश सोबतच्या तिघांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रमोदने त्यांच्यावरही विळ्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गणेशच्या फिर्यादीवरून प्रमोद कांबळे याच्यावर कलम ३०७, ३२४, ३२६, ५०६ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रमोद कांबळे याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास फौजदार भिकाने हे करत आहेत.दरम्यान, गणेश सरवदे आणि त्याच्या सोबतच्या तिघांनीच मला मारहाण केली अशी तक्रार प्रमोद कांबळे याने दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून चौघांवरही कलम ३२४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पो.ह. भुसारी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस