शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रामनाथ खोड यांच्या कुटुंबावरील ॲट्रॉसिटी उच्च न्यायालयाकडून रद्द

By शिरीष शिंदे | Updated: September 22, 2023 17:07 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला गुन्हा

बीड : सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी जमिनीच्या वादातील गुन्ह्याला काऊंटर करण्यासाठी पारुबाई खोड आणि मीराबाई रडे यांच्यावर ११ महिन्यापूर्वी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. यामुळे तब्बल ११ महिन्यांनी खोड कुटूंबियांना न्याय मिळाला आहे.

बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पारुबाई खोड व मीराबाई रडे यांना राधा सुतार यांची जात माहिती होती. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी राधा व अन्य एकजण कागदाचे शिट्स बाजारातून उचलत असताना पारुबाई खोड, मीराबाई रडे तेथे आल्या. त्याच वेळी अन्य दोघे दुचाकीवर आले. मीराबाई यांनी सुतार यांना कागदी शिट्स उचलू नका असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत राधा यांना हाकलून दिले. त्यावरुन पारुबाई खोड यांच्यासह इतरांविरुद्ध पेठबीड पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला होता. याला मिरा रडे आणि पारुबाई खोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

काय म्हणाले खंडपीठ ?सुनावणीअंति खंडपीठाने मत नोंदविले की, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजता गुन्हा घडला असताना रात्री १०.१७ वाजता गुन्हा का दाखल केला याचे कारण सांगितले गेले नाही. परंतु त्याच दिवशी चांडक बंधुंनी हॉटेलचे नुकसान केल्या प्रकरणी सांयकाळी ५.१७ वाजता गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आधीच्या एफआयआरला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरा एफआयआर दाखल केल्याचे ठामपणे म्हणता येईल. अशा स्थितीत अर्जदारांना खटल्याला समोर जाण्यास भाग पाडणे हे न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल असे मत खंडपीठाने नाेंदवीत पारुबाई खोड व मीराबाई रडे यांच्यावरील ॲट्राॅसिटीचा गुन्हा रद्द केला. दरम्यान, या निर्णयामुळे खोड कुटूंबियांना न्याय मिळाला असून खोटेनाटे करणाऱ्यांना चपराक बसली आहे. खोड यांच्यावतीने ॲड. सुषमा जाधव-गंभीरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबाद