शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुबडीऐवजी आता ताठपणे चालत शाळेत जाणार अशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:50 IST

कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नेकनूरच्या शाळेत जात होता. बीड येथील दिव्यांग शिबिरात आल्यानंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जन्मत:च पायाची चुंबळ झालेली. एक पाय चांगला, उजव्या पायाचा पंजा गुडघ्याबरोबर मागच्या बाजूला. शरीर तर वाढत होते. तशाच अवस्थेत शाळेत जाणारा अशोक नंतर काठीचा आधार घेऊन चालत होता. नंतर कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नेकनूरच्या शाळेत जात होता. बीड येथील दिव्यांग शिबिरात आल्यानंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला. आता तो कुबड्यांविना चालत शाळेत जाणार आहे. डाव्याच्या बरोबरीचा उजवा कृत्रिम पाय जोडल्यानंतर चालताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.वाघेबाभूळगाव (ता.केज) येथील अशोक बंडू पवार या शाळकरी मुलाची ही कहाणी. लहानपणीच वडील घर सोडून गेले. अशोक व दोन मुलांचा सांभाळ आई सिंधूबाईने केला. प्रसंगी अर्ध्या कोयत्याची मजुरी उचलीत ऊस तोडणीलाही गेल्या. अशोकला शिकण्याची ओढ होती. अपंगत्वामुळे शाळकरी मुले, मित्र मस्करी करीत पण नशिबाच्या थट्टेपुढे तो खचला नाही. पाय बरा करण्याचे आव्हान या कुटुंबापुढे होते. औंध, पुणे व इतर शहरात दाखवले. गुडघ्या खालचा भाग कापावा लागेल, पुढच्या सर्जरीसाठी व उपचारासाठी सत्तर हजारावर खर्च लागणार होता. मात्र हे करायला कुटुंबाची हिम्मत नव्हती.बीडमध्ये ८ मार्चपासून भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि भारतीय साधारण विमा निगम च्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या शिबिरात अशोक आला. डॉ. नारायणदास व्यास यांनी पाहिले. ओमप्रकाश वर्मा नावाच्या सहायकाने मोजमाप करुन अशोकचा पाय कसा बनवायचा याचे निरीक्षण केले. तीन तासात मोजमापानुसार अ‍ॅबोनी फूट तयार केले. कॅलिपर लॉक, गुडघ्यासाठी वाटी, गुडघ्यापासून पंजापर्यंत फायबर व जयपूर फूटचा वापर यात केला. अपंगत्व असलेल्या पायाला जोडला आणि क्षणभरात अशोक विनाकुबडी कुठलाही आधार न घेता उभा राहिला. नंतर व्यास स्वत: त्याच्या सोबत २०-२५ फूट अंतरापर्यंत चालले, नंतर अशोक स्वत:च चालू लागला. वयाच्या १४ व्या वर्षी दुसरा पाय मिळाल्याने खूप आनंद झालाय. आता मी गावापासून नेकनूरच्या जि. प. शाळेपर्यंत ताठपणे पायांवर जाणार असल्याचे सांगत शिबीर आयोजकांना त्याने धन्यवाद दिले.

टॅग्स :SocialसामाजिकStudentविद्यार्थी