शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:28 IST

चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते.

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : देशसेवेने झपाटलेला तांड्यावरचा तरुण मेहनत व जिद्दीने सैन्य दलात भरती झाला. शेतकरी कुटुंबाचे नशीब पालटले. मात्र, कर्करोगासारख्या घातक आजाराने जवानाला गाठले अन् काही दिवसांतच होत्याचे नव्हते झाले. सुखी संसाराची कहाणी अधुरीच राहिली अन् देशसेवेचे स्वप्नही अपूर्णच राहिले.

तालुक्यातील राजेगाव येथील बाराभाई तांड्यावरील भारत रामराव राठोड (२९) या जवानाचा कर्करोगाने ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. ४ रोजी त्यांचे पार्थिव पुण्याहून बीडला आणले. बाराभाई तांडा येेथे त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. १९९३ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भारत राठोड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजेगाव येथे झाले. लहानपणापासूनच भारत यांना देशसेवेचे आकर्षण होते. काटक व पिळदार शरीरयष्टी व जिद्दीच्या जोरावर त्यांची २०१२ साली सैन्य दलात निवड झाली. नागपूर येथे काही दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर जम्मू येथे त्यांना नियुक्ती मिळाली. सध्या ते तेथेच कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते. मात्र, प्रकृती खालावत गेली, त्यानंतर ३ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

कुटुंबीय शोकमग्नभारतचे आई-वडील हे शेतीबरोबरच मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. त्यांच्यामागे एक लहान बहीण, भाऊ अशी दोन भावंडे, पत्नी व ५ व ३ वर्षांच्या दोन मुली असा परिवार आहे. भारत हे कुटुंबाचा आधार होते. मात्र, नियतीने त्यांना हिरावून नेल्याने कुटुंब शोकमग्न झाले.

दोन महिन्यांपूर्वीची भेट अखेरचीभारत राठोड हे दोन महिन्यांपूर्वी बाराभाई तांडा येथे आले होते. काही दिवस राहून ते कर्तव्यावर परतले होते. दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांच्या आठवणी जागवत कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.

बरा होऊन येईन....दरम्यान, कर्करोगाचे निदान झाल्यावर भारत राठोड यांनी उपचार सुरू केले होते. कुटुंबीय काळजीत होते. तेव्हा त्यांनी धीर दिला होता. मी बरा होऊन लवकरच घरी येईन, असे ते म्हटले होते. मात्र, ते ते परतलेच नाहीत. त्यांच्या निधनाची वार्ता आल्यावर कुटुंबीयाला धक्का बसला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBeedबीडDeathमृत्यू