शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

बीडमध्ये अमृत योजना प्रगतीपथावर; वीज नसली तरी मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:01 IST

बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.

बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.

गत काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कसरत करून तहान भागवावी लागते. अनेकवेळा पाण्यासाठी पैसाही खर्च करावा लागला आहे. परंतु गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरण भरले. याच धरणांमधून बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे यावर्षी बीडकरांना जास्त पाणीटंचाई जाणवली नाही. अनेकवेळा केवळ पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आणि महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले होते.

दरम्यान, हाच धागा पकडून शासनाने बीड नगर पालिकेला अमृत योजनेंतर्गत ११४ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तात्काळ या कामाला सुरूवातही करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, बीड व नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग या योजनेवर लक्ष ठेवून आहे. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाळके, निखील नवले, श्रद्धा गर्जे, बांधकामचे अभियंता किरण देशमुख, मजीप्रचे अभियंता अमोल पाटील यांनी या योजनेची पाहणी करून आढावा घेतला.शहराला दररोज येणार ४९ एमएलडी पाणीबीड शहराला दररोज ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या बीडमध्ये केवळ २३ एमएलडी पाणी येते. त्यातही लिकेजेस, अनाधिकृत नळ कनेक्शन व इतर कारणांमुळे प्रत्यक्षात २० ते २१ एमएलडी पाणी बीडमध्ये येते. परंतु ही योजना पूर्ण झाल्यावर पहिली व नवीन जलवाहिणीतून जवळपास ४९ एमएलडी पाणी येणार आहे. यामुळे बीडकरांना रोज पाणी मिळेल.

पालिकेकडून होणार योग्य नियोजनसध्या अनेकवेळा दुर्लक्षामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो, हे अधिकाºयांनी मान्य केले आहे. परंतु यापुढे तसे होणार नाही. योग्य नियोजनासह सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग तत्पर असेल, असे सांगण्यात आले. बीडकरांची पाण्याविषयी तक्रार येणार नाही, आणि आली तर ती तात्काळ सोडविली जाणार आहे.

शहरात उभारणार १४ जलकुंभधरणातून पाणी आल्यानंतर ते साठवूण ठेवण्यासाठी बीड शहरात ८ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. अगोदर सहा जलकुंभ शहरात कार्यरत आहेत. १४ जलकुंभामुळे महावितरणकडून वेळेवर वीज मिळाली नाही, तरी पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही. यामध्ये लाखो लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. तसेच पाण्याच्या छोट्या टाक्यांची संख्या जवळपास १० च्या पुढे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूकMarathwadaमराठवाडा