शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये अमृत योजना प्रगतीपथावर; वीज नसली तरी मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:01 IST

बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.

बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.

गत काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कसरत करून तहान भागवावी लागते. अनेकवेळा पाण्यासाठी पैसाही खर्च करावा लागला आहे. परंतु गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरण भरले. याच धरणांमधून बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे यावर्षी बीडकरांना जास्त पाणीटंचाई जाणवली नाही. अनेकवेळा केवळ पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आणि महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले होते.

दरम्यान, हाच धागा पकडून शासनाने बीड नगर पालिकेला अमृत योजनेंतर्गत ११४ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तात्काळ या कामाला सुरूवातही करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, बीड व नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग या योजनेवर लक्ष ठेवून आहे. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाळके, निखील नवले, श्रद्धा गर्जे, बांधकामचे अभियंता किरण देशमुख, मजीप्रचे अभियंता अमोल पाटील यांनी या योजनेची पाहणी करून आढावा घेतला.शहराला दररोज येणार ४९ एमएलडी पाणीबीड शहराला दररोज ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या बीडमध्ये केवळ २३ एमएलडी पाणी येते. त्यातही लिकेजेस, अनाधिकृत नळ कनेक्शन व इतर कारणांमुळे प्रत्यक्षात २० ते २१ एमएलडी पाणी बीडमध्ये येते. परंतु ही योजना पूर्ण झाल्यावर पहिली व नवीन जलवाहिणीतून जवळपास ४९ एमएलडी पाणी येणार आहे. यामुळे बीडकरांना रोज पाणी मिळेल.

पालिकेकडून होणार योग्य नियोजनसध्या अनेकवेळा दुर्लक्षामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो, हे अधिकाºयांनी मान्य केले आहे. परंतु यापुढे तसे होणार नाही. योग्य नियोजनासह सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग तत्पर असेल, असे सांगण्यात आले. बीडकरांची पाण्याविषयी तक्रार येणार नाही, आणि आली तर ती तात्काळ सोडविली जाणार आहे.

शहरात उभारणार १४ जलकुंभधरणातून पाणी आल्यानंतर ते साठवूण ठेवण्यासाठी बीड शहरात ८ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. अगोदर सहा जलकुंभ शहरात कार्यरत आहेत. १४ जलकुंभामुळे महावितरणकडून वेळेवर वीज मिळाली नाही, तरी पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही. यामध्ये लाखो लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. तसेच पाण्याच्या छोट्या टाक्यांची संख्या जवळपास १० च्या पुढे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूकMarathwadaमराठवाडा