शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बीडमध्ये अमृत योजना प्रगतीपथावर; वीज नसली तरी मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:01 IST

बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.

बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ कोटी रूपयांचा निधी बीड नगर पालिकेला आलेला आहे.

गत काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. कसरत करून तहान भागवावी लागते. अनेकवेळा पाण्यासाठी पैसाही खर्च करावा लागला आहे. परंतु गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरण भरले. याच धरणांमधून बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे यावर्षी बीडकरांना जास्त पाणीटंचाई जाणवली नाही. अनेकवेळा केवळ पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आणि महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले होते.

दरम्यान, हाच धागा पकडून शासनाने बीड नगर पालिकेला अमृत योजनेंतर्गत ११४ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तात्काळ या कामाला सुरूवातही करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, बीड व नगर पालिकेचा पाणी पुरवठा विभाग या योजनेवर लक्ष ठेवून आहे. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाळके, निखील नवले, श्रद्धा गर्जे, बांधकामचे अभियंता किरण देशमुख, मजीप्रचे अभियंता अमोल पाटील यांनी या योजनेची पाहणी करून आढावा घेतला.शहराला दररोज येणार ४९ एमएलडी पाणीबीड शहराला दररोज ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या बीडमध्ये केवळ २३ एमएलडी पाणी येते. त्यातही लिकेजेस, अनाधिकृत नळ कनेक्शन व इतर कारणांमुळे प्रत्यक्षात २० ते २१ एमएलडी पाणी बीडमध्ये येते. परंतु ही योजना पूर्ण झाल्यावर पहिली व नवीन जलवाहिणीतून जवळपास ४९ एमएलडी पाणी येणार आहे. यामुळे बीडकरांना रोज पाणी मिळेल.

पालिकेकडून होणार योग्य नियोजनसध्या अनेकवेळा दुर्लक्षामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो, हे अधिकाºयांनी मान्य केले आहे. परंतु यापुढे तसे होणार नाही. योग्य नियोजनासह सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग तत्पर असेल, असे सांगण्यात आले. बीडकरांची पाण्याविषयी तक्रार येणार नाही, आणि आली तर ती तात्काळ सोडविली जाणार आहे.

शहरात उभारणार १४ जलकुंभधरणातून पाणी आल्यानंतर ते साठवूण ठेवण्यासाठी बीड शहरात ८ नवीन जलकुंभ उभारले जाणार आहेत. अगोदर सहा जलकुंभ शहरात कार्यरत आहेत. १४ जलकुंभामुळे महावितरणकडून वेळेवर वीज मिळाली नाही, तरी पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही. यामध्ये लाखो लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. तसेच पाण्याच्या छोट्या टाक्यांची संख्या जवळपास १० च्या पुढे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूकMarathwadaमराठवाडा