शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:07 IST

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात

बीड : पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.खडकपुरा व वतारवेस येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, भाजपाचे भगिरथ बियाणी, सलिम जहाँगीर, सुशील पिंगळे, सागर बहीर, विकास जोगदंड, रामिसंग राख, दिलीप भोसले, शुभम कांतांगळे, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, निवडणुकीत अफवा पसरविल्या जातात. भावनिक आणि जातीयवादी अफवापासून मतदारांनी दूर रहावे. शिवसेना हा जातीयवादी नसून या पक्षात सर्वांनाच सामावून घेतले जाते. सत्तेत असो वा नसो अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच राहिला आहे. सर्वानाच मदत करायची माझी भावना या समाजाने अनुभवली आहे. मी कधीही जातीवाद किंवा भाउक विधाने करु न कुणाचे मन दुखावले नाही, असे जयदत्तअण्णा म्हणाले.माजी खासदार केशरकाकू यांच्यापासून सर्वधर्मसमभावाचे तत्व अंगिकारले आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक ध्रुवीकरण करून विकासाच्या मुद्यावरच आपण निवडणुका लढल्या आहेत. आमचा चांगुलपणा ही आमची ताकद आहे. म्हणूनच आम्ही कुठेही असलो तरी मतदार आमच्यासोबतच असतो, हे सत्य आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.यावेळी अनिल जगताप यांनीही मार्गदर्शन करताना जयदत्तअण्णांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांसह सर्वांनाच भेदाभेद न करता सहकार्य कसे केले हे सांगितले. अण्णांच्या विजयासाठी शिवसैनिक रात्रदिवस मेहनत घेत असल्याचे जगताप म्हणाले.विजयासाठी वज्रमुठ आवळा - नितीन बानगुडे पाटीलचौसाळा : जयदत्त क्षीरसागर यांना विकासाची दुरदृष्टी आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी, विकास योजना आणण्यासाठी उमेदवार हा अभ्यासू असावा लागतो.जयदत्तअण्णांना निवडून आणा, त्यांचे मंत्रीपद पक्के आहे, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी चौसाळा येथे मतदारांना आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना