शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
5
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
6
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
7
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
8
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
9
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
10
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
11
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
12
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
13
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
14
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
15
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
16
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
17
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
18
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
19
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
20
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:07 IST

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात

बीड : पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.खडकपुरा व वतारवेस येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, भाजपाचे भगिरथ बियाणी, सलिम जहाँगीर, सुशील पिंगळे, सागर बहीर, विकास जोगदंड, रामिसंग राख, दिलीप भोसले, शुभम कांतांगळे, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, निवडणुकीत अफवा पसरविल्या जातात. भावनिक आणि जातीयवादी अफवापासून मतदारांनी दूर रहावे. शिवसेना हा जातीयवादी नसून या पक्षात सर्वांनाच सामावून घेतले जाते. सत्तेत असो वा नसो अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच राहिला आहे. सर्वानाच मदत करायची माझी भावना या समाजाने अनुभवली आहे. मी कधीही जातीवाद किंवा भाउक विधाने करु न कुणाचे मन दुखावले नाही, असे जयदत्तअण्णा म्हणाले.माजी खासदार केशरकाकू यांच्यापासून सर्वधर्मसमभावाचे तत्व अंगिकारले आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक ध्रुवीकरण करून विकासाच्या मुद्यावरच आपण निवडणुका लढल्या आहेत. आमचा चांगुलपणा ही आमची ताकद आहे. म्हणूनच आम्ही कुठेही असलो तरी मतदार आमच्यासोबतच असतो, हे सत्य आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.यावेळी अनिल जगताप यांनीही मार्गदर्शन करताना जयदत्तअण्णांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांसह सर्वांनाच भेदाभेद न करता सहकार्य कसे केले हे सांगितले. अण्णांच्या विजयासाठी शिवसैनिक रात्रदिवस मेहनत घेत असल्याचे जगताप म्हणाले.विजयासाठी वज्रमुठ आवळा - नितीन बानगुडे पाटीलचौसाळा : जयदत्त क्षीरसागर यांना विकासाची दुरदृष्टी आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी, विकास योजना आणण्यासाठी उमेदवार हा अभ्यासू असावा लागतो.जयदत्तअण्णांना निवडून आणा, त्यांचे मंत्रीपद पक्के आहे, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी चौसाळा येथे मतदारांना आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना