शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:07 IST

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात

बीड : पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.खडकपुरा व वतारवेस येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, भाजपाचे भगिरथ बियाणी, सलिम जहाँगीर, सुशील पिंगळे, सागर बहीर, विकास जोगदंड, रामिसंग राख, दिलीप भोसले, शुभम कांतांगळे, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, निवडणुकीत अफवा पसरविल्या जातात. भावनिक आणि जातीयवादी अफवापासून मतदारांनी दूर रहावे. शिवसेना हा जातीयवादी नसून या पक्षात सर्वांनाच सामावून घेतले जाते. सत्तेत असो वा नसो अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच राहिला आहे. सर्वानाच मदत करायची माझी भावना या समाजाने अनुभवली आहे. मी कधीही जातीवाद किंवा भाउक विधाने करु न कुणाचे मन दुखावले नाही, असे जयदत्तअण्णा म्हणाले.माजी खासदार केशरकाकू यांच्यापासून सर्वधर्मसमभावाचे तत्व अंगिकारले आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक ध्रुवीकरण करून विकासाच्या मुद्यावरच आपण निवडणुका लढल्या आहेत. आमचा चांगुलपणा ही आमची ताकद आहे. म्हणूनच आम्ही कुठेही असलो तरी मतदार आमच्यासोबतच असतो, हे सत्य आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.यावेळी अनिल जगताप यांनीही मार्गदर्शन करताना जयदत्तअण्णांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांसह सर्वांनाच भेदाभेद न करता सहकार्य कसे केले हे सांगितले. अण्णांच्या विजयासाठी शिवसैनिक रात्रदिवस मेहनत घेत असल्याचे जगताप म्हणाले.विजयासाठी वज्रमुठ आवळा - नितीन बानगुडे पाटीलचौसाळा : जयदत्त क्षीरसागर यांना विकासाची दुरदृष्टी आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी, विकास योजना आणण्यासाठी उमेदवार हा अभ्यासू असावा लागतो.जयदत्तअण्णांना निवडून आणा, त्यांचे मंत्रीपद पक्के आहे, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी चौसाळा येथे मतदारांना आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना