शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद; वीज निर्मिती शून्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:21 IST

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

- संजय खाकरेपरळी (जि. बीड) : मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती पूर्णतः ठप्प झाली आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण ७५० मेगावॅट क्षमतेपैकी सध्या शून्य वीज निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे.

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, संपूर्ण मराठवाड्यातील हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे, जे येथे धडधडत होते. परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव व दाऊतपूर शिवारातील नवीन औष्णिक केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यातील संच क्रमांक सहा व सात हे दोन संच मागील १५ दिवसांपासून बंद आहेत, तर संच क्रमांक आठ तब्बल महिनाभरापासून बंद आहे. यामुळे परळीतील औष्णिक विद्युत केंद्राची वीज निर्मिती सध्या संपूर्ण थांबली आहे. विद्युत संच बंद ठेवण्यात आल्याने, कोळशाचा पुरवठादेखील कमी प्रमाणात होत असल्याने ही स्थिती अधिक बिकट झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच बंद ठेवलेले संच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

८०० अधिकारी, कर्मचारीराज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर हे संच कार्यरत होतील. दरम्यान, या नवीन औष्णिक केंद्रात सुमारे ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मात्र, तीनही संच बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हे संच कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beedबीडelectricityवीजmahavitaranमहावितरण