शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST

बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे ...

बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे सुरूच असून, आता पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

खरीप हंगातील सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास २ लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला होता. दरम्यान, सोयाबीन पीक काढणीला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी १० ते १५ दिवसात सोयाबीन काढण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, २० ते २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनावर तसेच कापूस व इतर पिकांवरदेखील जास्तीच्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शासन व विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत होती. त्यानुसार जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसात नुकसानीचा पूर्ण अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार शासन स्तरावरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मदत केली जाणार आहे. मात्र, पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पिकांचे नुकसान होणार असून, पुन्हा पंचनामे करण्याची गरज भासू शकते.

शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

सोयाबीन काढणीला आलेले असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर तत्काळ काढणी करण्यात यावी. तसेच पावसाची शक्यता असल्यामुळे सोयाबीन भिजणार नाही याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी. ज्यांच्या काढणीला १० ते १५ दिवसाचा अवधी आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

७० टक्के पंचनामे पूर्ण

महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये आतापर्यंत ७० टक्के म्हणजेच ३ लाख ६० हजार १३८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ४८ हजार ९२४ इतकी आहे.

पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या दोन दिवसात शासनाकडे नुकसानीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे. हवामान बदलामुळे पिकांवरील धोका कायम असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या साहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. - बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड