शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST

बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे ...

बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे सुरूच असून, आता पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

खरीप हंगातील सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास २ लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला होता. दरम्यान, सोयाबीन पीक काढणीला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी १० ते १५ दिवसात सोयाबीन काढण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, २० ते २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनावर तसेच कापूस व इतर पिकांवरदेखील जास्तीच्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शासन व विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत होती. त्यानुसार जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसात नुकसानीचा पूर्ण अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार शासन स्तरावरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मदत केली जाणार आहे. मात्र, पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पिकांचे नुकसान होणार असून, पुन्हा पंचनामे करण्याची गरज भासू शकते.

शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

सोयाबीन काढणीला आलेले असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर तत्काळ काढणी करण्यात यावी. तसेच पावसाची शक्यता असल्यामुळे सोयाबीन भिजणार नाही याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी. ज्यांच्या काढणीला १० ते १५ दिवसाचा अवधी आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

७० टक्के पंचनामे पूर्ण

महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये आतापर्यंत ७० टक्के म्हणजेच ३ लाख ६० हजार १३८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ४८ हजार ९२४ इतकी आहे.

पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या दोन दिवसात शासनाकडे नुकसानीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे. हवामान बदलामुळे पिकांवरील धोका कायम असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या साहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. - बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड