शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

पुन्हा अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST

बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे ...

बीड : अतिृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे सुरूच असून, आता पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

खरीप हंगातील सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास २ लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला होता. दरम्यान, सोयाबीन पीक काढणीला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी १० ते १५ दिवसात सोयाबीन काढण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, २० ते २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनावर तसेच कापूस व इतर पिकांवरदेखील जास्तीच्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शासन व विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत होती. त्यानुसार जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसात नुकसानीचा पूर्ण अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार शासन स्तरावरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मदत केली जाणार आहे. मात्र, पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पिकांचे नुकसान होणार असून, पुन्हा पंचनामे करण्याची गरज भासू शकते.

शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

सोयाबीन काढणीला आलेले असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर तत्काळ काढणी करण्यात यावी. तसेच पावसाची शक्यता असल्यामुळे सोयाबीन भिजणार नाही याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी. ज्यांच्या काढणीला १० ते १५ दिवसाचा अवधी आहे, अशा शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

७० टक्के पंचनामे पूर्ण

महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये आतापर्यंत ७० टक्के म्हणजेच ३ लाख ६० हजार १३८ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ४८ हजार ९२४ इतकी आहे.

पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर असून, येत्या दोन दिवसात शासनाकडे नुकसानीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे. हवामान बदलामुळे पिकांवरील धोका कायम असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या साहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. - बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड