शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

७२ वर्षांनंतर मामला तलावाने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:22 IST

वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची गडद छाया : मात करण्यासाठी प्रशासन सज्ज; २५० फुटापर्यंत खोदकाम करूनही बोअरवेल कोरडेच...!

वडवणी : वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे.शहरासह व तांडे वस्तीमधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी मामला तलावातून पाणी पुरवठा केला जात आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत नगण्य पाऊस झाल्याने तलावात पाणी साठा अपुरा आहे. भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने दीड महिन्यांपासून तलावातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह असल्याने आतापासूनच बोअर घेणाºया गाड्या शेतात फिरू लागल्या आहेत. पाणी पातळी खालावल्याने खोदकाम करताना २०० ते २५० फुटापर्यंत केवळ धुराळाच उडत आहे.तालुक्यात कधी नव्हे ते या वर्षी पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण घटल्याने पाणी पातळी कमालीची घटली आहे. शेतकºयांच्या हातातून खरीप व रबी अशी दोन्ही हंगाम गेल्यात जमा आहेत, फळबागा, इतर बागायती पिके अल्पश्या पाण्यावर तग धरून होती; मात्र तेही यावर्षी नष्ट झाली आहेत, भविष्यात हे बागायती क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. शेतकºयांची आशाही वेडी असते, जमिनीत पीक येवो अथा न येवो, तो पेरणी करतोच. त्यानंतर पाण्याच्या आशेने खोलवर विहीर, बोअर घेण्याचे त्याचे कार्य सुरूच असते.यावर्षी जानेवारी महिन्यातच सर्वच पाणी साठ्यांनी तळ गाठला, तर काही पूर्णपणे आटले आहेत. शेतकºयांनी आहे ते बागायती पीक व जनावरांना जगवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, दरवर्षी फेब्रुवारी, मार्चनंतर येणाºया परप्रांतीय गाड्या परिसरात नोंव्हेबरमध्येच अवतरल्या. त्यांचीही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी पाणी लागेल या आशेने बोअर घेत आहेत. ९०० फुटापर्यंतही बोअर घेऊन फारसे पाणी लागत नसल्यान, तसचे काही बोअर कोरडे जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकूणच या वर्षी पाणी प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे.या दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून, त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा मंगल मुंडे यांनी सांगितले.१७ प्रस्ताव दाखल : दोन टँकर कार्यरतशहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १७ टॅकर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून फक्त ६ टॅकर प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यापैकी २ टॅकर कार्यान्वित झाली आहेत.मंजूर टँकरपैकी ४ अजूनही अद्यापही दाखल झाले नाहीत.६ टॅकरच्या प्रत्येकी ३ खेपा प्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख टी.व्ही. रांजवण यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई