शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आरोपीचा कोठडीत मृत्यू, परळीनंतर परभणीच्या पोलिस अधिकाऱ्यालाही बेड्या

By सोमनाथ खताळ | Updated: May 13, 2023 12:04 IST

उमेश कस्तुरे हे २०१४ साली परळी शहर ठाण्यात प्रभारी अधिकारी होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संभाजीचा मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

बीड : परळी शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणत बीडच्या सीआयडीने (गुन्हे अन्वेषण विभाग) गुरुवारी परळी शहरचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यापाठोपाठ आता परभणीच्या सहायक पोलिस निरीक्षकालाही बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांत दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

संभाजी जोगदंड (रा. नागापूर, खु. ता. परळी) याला चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून परळी शहर पोलिसांनी अटक केली होती. १५ ऑगस्ट २०१४ रोजी त्याचा कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणात बीड सीआयडीने तपास केला. यात तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, सचिन सारणीकर, विकास वाघमारे, नागरगोजे आणि कातखडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला होता. परंतु संभाजीच्या आईने न्यायालयात धाव घेत आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याला मारहाण करून मारले, असा आरोप केला होता.

यात न्यायालयाने कलम ३०२ वाढवून पुन्हा तपास करा, असा आदेश सीआयडीला दिला. त्याप्रमाणे आता पुन्हा तपासाला सुरुवात झाली असून, गुरुवारी परळी शहरचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. ते कोठडीत जात नाहीत तोच परभणी येथील कोतवाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांचा जास्त सहभाग नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई बीड सीआयडीचे उपअधीक्षक सुभाष दुधाळ, पोलिस निरीक्षक मनीषा घोडके, योगेश नाईकनवरे, अमोल बागलाने, बंडू सत्वधर यांनी केली.

जमादार, कस्तुरे यांचा सहभाग कसा?

उमेश कस्तुरे हे २०१४ साली परळी शहर ठाण्यात प्रभारी अधिकारी होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे संभाजीचा मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तर सपोनि बळवंत जमादार हे तेव्हा अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयात वाचक शाखेत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी पेट्रोलिंगदरम्यान त्यांनी परळी शहराला भेट दिली, परंतु आरोपी आहे की नाही? याची नोंदच घेतली नाही. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दोन दिवसांत दोन पोलिस अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे.