शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बीडमधील ८४० बोगस पीकविमाधारकांकडून तब्बल ७८ लाख रुपये होणार वसूल

By शिरीष शिंदे | Updated: March 18, 2025 19:54 IST

कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात यासंबंधीचे पत्र नुकतेच पाठविले आहे.

बीड : शासकीय जमिनी, बोगस सातबारा, करारनामा न देणाऱ्या ८४० बोगस पीकविमाधारकांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी ३४० जणांना ३४ लाख वितरित झाले असून ५०० जणांच्या खात्यावर ४४ लाख रुपयांची विमा रक्कम जमा होत आहे. सदरील ८४० बोगस पीकविमाधारकांकडून सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात यासंबंधीचे पत्र नुकतेच पाठविले आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना हा बोगस विमा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता.

खरीप-२०२३ च्या हंगामामध्ये दलाल, सीएससी चालकांनी ३३५७ जणांच्या नावे बोगस पीकविमा भरला असल्याचा आरोप करत आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली होती. त्यानुसार भारतीय कृषी पीकविमा कंपनीने पडताळणी केली असता, ३३५७ विमा अर्जांपैकी २२८४ विमा अर्ज पूर्वीच नाकारले होते. तर १०७३ अर्ज ‘एआयसी’ने मंजूर केले होते. १०७३ अर्जांपैकी २३३ अपात्र ठरले होते. त्यामुळे एकूण ८४० विमा अर्ज मंजूर झाले होते. त्यामुळे सदरील बनावट अर्जदारांना नुकसानभरपाई रक्कम अदा करण्यात आलेली आहे. सदरील नुकसानभरपाई रक्कम बँक खात्यावर ताबडतोब जमा करण्याकरिता जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समितीद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना सूचित करावे, जेणेकरून राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडून प्राप्त विमा हप्ता अनुदान राज्य व केंद्र शासनास परत करता येईल, असे कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना वसुलीसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

असे आहे वर्गीकरणबनावट सातबारा असणारे ७४ अर्ज, शासकीय जमीन दाखवून भरलेले ५२१, जमीन नावे नसल्याचे प्रमाणापत्र भरलेले १७, करारनामा स्टॅम्प पेपरवर न देणार ७० तर करारनामा प्रमाणापत्र न जोडणारे १५८ असे एकूण ८४० बनावट पीकविमा भरणारे आहेत. या ८४० बोगस पीकविमाधारकांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी ३४० जणांना ३४ लाख वितरित झाले असून, ५०० जणांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होत आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत ते होल्ड करून उर्वरित बनावट लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील.

महसूलचा पुढाकार आवश्यकबनावट शेतकऱ्यांनी पीकविमा भरून तब्बल ३४ लाख रुपये लाटले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची बैठक घेऊन याबाबत सर्वांना सूचना करणे आवश्यक आहे. तसेच अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संबंधितांना नोटीस देणे आवश्यक आहे. अन्यथा एवढी मोठी रक्कम वसूल होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडCrime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या