शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बीड जिल्ह्यात ९९.५२ टक्के पेरण्या पूर्ण मात्र पावसाने ओढ दिल्याने पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:40 IST

संपूर्ण जिल्ह्यात ९९.५२ टक्के खरीप पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९.५२ टक्के खरीप पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जून महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. मात्र जुलै महिन्यात देखील वरूणराजाची कृपा झाली नाही. त्यामुळे अल्प पावसावर जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा पूर्ण झाला आहे. मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जुलै महिनाअखेर आले तरी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटलेलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची मुळे जमिनीमध्ये खोलवर रूजतात. मात्र, ओलावा कमी होत असल्यामुळे वाढ खुंटून पिके सुकू लागली आहेत. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

कृषी विभागाच्या सल्ल्याने करा उपाययोजनाढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळोवेळी कृषी विभागाचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.वेळेवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली तर, पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण व किडीचा प्रादुर्भाव रोखता येईल. तसेच पुढील आठ ते दहा दिवस पावसाने ओढ दिली तरी देखील पिके न सुकता तग धरू शकतील, असे मत बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व शिरुर तालुका कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी व्यक्त केले. कडधान्यांपेक्षा कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना पावसाची अधिक आवश्यकता असते. जमिनीतील ओल कमी झाल्यामुळे पिकांना मिळणारे आवश्यक मूलद्रव्ये कमी पडत आहेत. त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकांवर औषधांची फवारणी करावी.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस