शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

भूसंपादनाची ९७२ प्रकरणे निघणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:27 IST

राष्ट्रीय महामार्गासाठी ज्यांची शेती किंवा जागा भूसंपादित झाली आहे. त्यांची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित होते. अशी सर्व ९७२ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुनावणी घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रीय महामार्गासाठी ज्यांची शेती किंवा जागा भूसंपादित झाली आहे. त्यांची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित होते. अशी सर्व ९७२ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी मंगळवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लवादाचे प्रमुख तथा बीड जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुनावणी घेतली. यावेळी जे पक्षकार शेतकरी मावेजा मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी आपल्या विधिज्ञामार्फत अथवा स्वत: यावेळी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.ही प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ते प्रलंबित राहण्यामागे देखील विविध कारणे होते. मात्र, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेती रस्त्यासाठी संपादीत झाली आहे. त्यांना मात्र, मावेजा मिळालेला नव्हात त्यामुळे ते जिल्हाधिकारी तसेच संबंधीत कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. मात्र, जिल्हाधिकारी यांनी मंगळवार व बुधवार या दोन दिवसात ९७२ प्रकरणांवर सुनावणी घेऊन पुढील प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ७११ प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. तर बुधवारी उर्वरित प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, अतिरिक्त सरकारी वकील एस.व्ही.सुलाखे, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, नायब तहसीलदार अभय जोशी व अव्वल कारकून श्रीधर वखरे पक्षकार शेतकरी व विधिज्ञ उपस्थित होते.तीन-चार टप्प्यांत होणार प्रक्रियामागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महामार्गा भूसंपादनाच्या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन ९७२ प्रकरणे यामध्ये घेतली आहेत. दोन दिवस संबंधित पक्षकार किंवा त्याच्या वतीने विधिज्ञांनी आपले म्हणणे मांडले. यावेळी भूसंपादनाचा मावेजा किती असावा यावर आपली बाजू मांडली त्यानंतर यासंदर्भात दुस-या फेरीत महामार्ग अधिकारी व भूसंपादन अधिकारी आपली बाजू मांडतील.ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतक-यांच्या न्यायासाठी आदेश संमत केला जाईल, व त्यांना मावेजा रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येईल. मात्र, ही प्रकरणे अनेक महिन्यांपासून निर्णयापासून प्रलंबित होती. ती सर्व प्रकरणे निकाली कढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्यामुळे तसेच जलद गतिने सर्व प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश दिल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्णयाचे शेतक-यांमधून स्वागत केले जात आहे.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडNational Highwayराष्ट्रीय महामार्गFarmerशेतकरी