शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बीड जिल्ह्यातून तीन टोळ्यांतील ९ गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:17 IST

तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

बीड : जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसावा व गुंडांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील एकुण ९ जणांना एका वषार्साठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. निवडणूकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

गुंडगिरी करुन दहशत निर्माण करणाऱ्या  लोकांविरुध्द कायदेशीर कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणे प्रमुखांना दिले. त्यानुसार अंबाजोगाई ग्रामीणचे उपनिरीक्षक एस.डी.भोकाणे यांनी परमेश्ववर उर्फ बाळासाहेब नारायण जाधव, जीवन मोहन अंधारे, युवराज माणिक चव्हाण व शेख मंजुर शेख यासीन (सर्व रा.घाटनांदूर ता.अंबाजोगाई) यांच्यासह उपनिरीक्षक एस.यु.जाधव यांनी शेख एजाज शेख इसाक, दगडू बापु शेरेकर, नागनाथ गोविंद लामतुरे (सर्व रा.घाटनांदूर) या दोन टोळ्यांविरुध्द मटका जुगाराचे गुन्हे असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ प्रमाण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवले होते. 

याशिवाय गेवराईचे तत्कालीन पो.नि.दिनेश आहेर यांनी मालाविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या अविनाश कल्याण धुरंधरे (रा.मादळमोही ह.मु.तेलगाव नाका,बीड) व लहु सुभाष हातागळे (रा.काळा हनुमान ठाणा, बीड) यांच्याविरुध्द प्रस्ताव तयार केला होता. घाटनांदूरच्या प्रस्तावाची अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी तर बीडमधील प्रस्तावाची उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी चौकशी करत या लोकांना हद्दपार करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांकडे केली. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूका शांततेत पार पडाव्यात या दृष्टीने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तीनही टोळ्यातील नऊ जणांना बीड जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस