शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बीडमध्ये वन महोत्सवात लावलेली ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:59 IST

कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.

कृषी दिनानिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान जिल्हाभरात वन महोत्सव सप्ताह साजरा झाला. यावर्षी जिल्ह्याला १२ लाख ८२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट वन विभागाने पूर्ण केले. शिवाय जास्तीची ५ लाख झाडेही लावली. राज्यात तिसऱ्या क्रमाकांवर बीड जिल्हा होता. लावलेली झाडे जगविण्यासंदर्भात प्रत्येक शासकीय कार्यालयासह संस्थांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतल्याचे सध्यातरी कागदावरील आकड्यांवरुन पाहवयास मिळत आहे. वनविभागाने जिल्हाभरात ४२ ठिकाणी ६ लाख ८० हजार झाडे लावली होती. पैकी ६ लाख ६८ हजार झाडे जगली आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात लावण्यात येणाºया रोपवाटिकेची गुरूवारी अमोल सातपुते, वनपाल दावणे यांनी पाहणी केली.यांचा उद्दिष्टपूर्तीकडे कानाडोळाप्रत्येक शासकीय कार्यालयास झाडे लावण्यासंदर्भात उद्दिष्ट दिले होते. मात्र, जायकवाडी पाटबंधारे विभाग, माजलगाव पाटबंधारे विभाग तसेच बीड आणि अंबाजोगाई येथील तिन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने ही उद्दिष्टपूर्ती केलीच नाही. त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. खुलाशात त्यांनी पुढच्या वर्षी अधिक झाडे लावण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर यावर्षी कठोर कारवाई झाली नाही, असेही सूत्रांकडून समजते.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्षझाडे जगविण्यात ग्रामपंचायत कार्यालय कुचकामी ठरत आहे. त्यांची टक्केवारी ७१ टक्के आहे, तर कृषी विभाग, जलसंधारण, बांधकाम व नगरपालिका यांची टक्केवारी ६८ टक्के आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यात ८० टक्के झाडे जगविली आहेत.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीforestजंगल