शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बीडमध्ये वन महोत्सवात लावलेली ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:59 IST

कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत.

कृषी दिनानिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान जिल्हाभरात वन महोत्सव सप्ताह साजरा झाला. यावर्षी जिल्ह्याला १२ लाख ८२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट वन विभागाने पूर्ण केले. शिवाय जास्तीची ५ लाख झाडेही लावली. राज्यात तिसऱ्या क्रमाकांवर बीड जिल्हा होता. लावलेली झाडे जगविण्यासंदर्भात प्रत्येक शासकीय कार्यालयासह संस्थांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतल्याचे सध्यातरी कागदावरील आकड्यांवरुन पाहवयास मिळत आहे. वनविभागाने जिल्हाभरात ४२ ठिकाणी ६ लाख ८० हजार झाडे लावली होती. पैकी ६ लाख ६८ हजार झाडे जगली आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात लावण्यात येणाºया रोपवाटिकेची गुरूवारी अमोल सातपुते, वनपाल दावणे यांनी पाहणी केली.यांचा उद्दिष्टपूर्तीकडे कानाडोळाप्रत्येक शासकीय कार्यालयास झाडे लावण्यासंदर्भात उद्दिष्ट दिले होते. मात्र, जायकवाडी पाटबंधारे विभाग, माजलगाव पाटबंधारे विभाग तसेच बीड आणि अंबाजोगाई येथील तिन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाने ही उद्दिष्टपूर्ती केलीच नाही. त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. खुलाशात त्यांनी पुढच्या वर्षी अधिक झाडे लावण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर यावर्षी कठोर कारवाई झाली नाही, असेही सूत्रांकडून समजते.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्षझाडे जगविण्यात ग्रामपंचायत कार्यालय कुचकामी ठरत आहे. त्यांची टक्केवारी ७१ टक्के आहे, तर कृषी विभाग, जलसंधारण, बांधकाम व नगरपालिका यांची टक्केवारी ६८ टक्के आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यात ८० टक्के झाडे जगविली आहेत.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीforestजंगल