शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील ८२ प्रकल्प कोरडे, ४६ जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:07 IST

जिल्ह्यातील ८२ प्रकल्पामधील जलसाठे कोरडे झाले आहेत. तसेच जोत्याखाली पाणीसाठा आसेलेल प्रकल्पांची संख्या ४६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती चिंताजनक : टँकरची संख्या ५७० च्या पुढे, प्रशासनाचे नियंत्रण झाले कमी, नियमांकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष

बीड : जिल्ह्यातील ८२ प्रकल्पामधील जलसाठे कोरडे झाले आहेत. तसेच जोत्याखाली पाणीसाठा आसेलेल प्रकल्पांची संख्या ४६ वर पोहचली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या मात्र वाढतच चलाली आहे. प्रकल्पामधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत.बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम, १२६ लघु असे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ८२ प्रल्प कोरडे पडले आहेत. तर ४६ प्रकल्पांमधील पाणीसाठा हा जोत्याच्या खाली पोहचला आहे. माजलगांव, मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर सिंदफणा, बिंदुसरा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, कांबळी, वाण, बोरणा, कुंडलीका, बोधेगाव, सरस्वती, वाघेबाभूळगांव असे १६ लघु प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पाची पाणी क्षमता ११३७ दलघमी आहे. पैकी फक्त ११ दलघमी इतका पाणीसाठा उपयुक्त आहे.प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे व टँकरची संख्या वाढल्यामुळे पुढील दोन ते अडीच महिने कसे काढायचे हा देखील प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.जिल्ह्यात सद्य: परिस्थिमध्ये ५७० टँकरच्या माध्यमातून ४४३४ गावे व १८७ वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक प्रकल्पातील पाण्यांवर टँकरची मदार आहे. तसेच ज्या ठिकाणी विहिरींना पाणी उपलब्ध आहे त्याठिकाणी १५१ विहीरींवरुन टँकर पाणीपुरवठा करत आहे. तसेच टँकर व्यतीरिक्त ५४७ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.पाणी टंचाईमध्ये नागरिकांना संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदारांकडून नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे काही ठिकाणी टँकरच्या खेपा कमी होत असल्यामुळे पाण्यावाचून नागिरकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी देखील काही गावांमधून आल्याची माहिती आहे. त्यामुळे कमी होत असलेला पाणीसाठा व वाढत असलेली टँकरची संख्या याचा मेळ घालून टंचाईवर मात करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. येत्या १५ दिवसात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.विभागीय आयुक्त घेणार आढावाजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये टंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रशासच्या माध्यमातून योग्य तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.मात्र, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर देखील जिल्हा दौºयावर येणार असून छावणी व टँकर, रोहयो यासह इतर उपाययोजनांची पाहणी करणार असून गौरप्रकरा आढळ््यास संबंधीत अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई