शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

बीड जिल्ह्यातील ८२ प्रकल्प कोरडे, ४६ जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:07 IST

जिल्ह्यातील ८२ प्रकल्पामधील जलसाठे कोरडे झाले आहेत. तसेच जोत्याखाली पाणीसाठा आसेलेल प्रकल्पांची संख्या ४६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती चिंताजनक : टँकरची संख्या ५७० च्या पुढे, प्रशासनाचे नियंत्रण झाले कमी, नियमांकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष

बीड : जिल्ह्यातील ८२ प्रकल्पामधील जलसाठे कोरडे झाले आहेत. तसेच जोत्याखाली पाणीसाठा आसेलेल प्रकल्पांची संख्या ४६ वर पोहचली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या मात्र वाढतच चलाली आहे. प्रकल्पामधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत.बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम, १२६ लघु असे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ८२ प्रल्प कोरडे पडले आहेत. तर ४६ प्रकल्पांमधील पाणीसाठा हा जोत्याच्या खाली पोहचला आहे. माजलगांव, मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर सिंदफणा, बिंदुसरा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, कांबळी, वाण, बोरणा, कुंडलीका, बोधेगाव, सरस्वती, वाघेबाभूळगांव असे १६ लघु प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पाची पाणी क्षमता ११३७ दलघमी आहे. पैकी फक्त ११ दलघमी इतका पाणीसाठा उपयुक्त आहे.प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे व टँकरची संख्या वाढल्यामुळे पुढील दोन ते अडीच महिने कसे काढायचे हा देखील प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.जिल्ह्यात सद्य: परिस्थिमध्ये ५७० टँकरच्या माध्यमातून ४४३४ गावे व १८७ वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक प्रकल्पातील पाण्यांवर टँकरची मदार आहे. तसेच ज्या ठिकाणी विहिरींना पाणी उपलब्ध आहे त्याठिकाणी १५१ विहीरींवरुन टँकर पाणीपुरवठा करत आहे. तसेच टँकर व्यतीरिक्त ५४७ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.पाणी टंचाईमध्ये नागरिकांना संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदारांकडून नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे काही ठिकाणी टँकरच्या खेपा कमी होत असल्यामुळे पाण्यावाचून नागिरकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी देखील काही गावांमधून आल्याची माहिती आहे. त्यामुळे कमी होत असलेला पाणीसाठा व वाढत असलेली टँकरची संख्या याचा मेळ घालून टंचाईवर मात करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. येत्या १५ दिवसात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.विभागीय आयुक्त घेणार आढावाजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये टंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रशासच्या माध्यमातून योग्य तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.मात्र, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर देखील जिल्हा दौºयावर येणार असून छावणी व टँकर, रोहयो यासह इतर उपाययोजनांची पाहणी करणार असून गौरप्रकरा आढळ््यास संबंधीत अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई