शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पिंपळ्यात विषबाधेने ८ शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:42 IST

पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली.पिंपळा येथील शेतकरी मितीन जनार्दन चव्हाण यांच्याकडे ३२ शेळ्या असून, चारा उपलब्ध नसल्याने शेतात मिळेल तिथे ते चारण्यासाठी गेले होते. नितीन म्हेत्रे यांच्या शेतात चरत असताना तेथे टाकलेले पिठाचे विषारी औषध खाल्याने यातील ८ शेळ्या जागीच दगावल्या. तर ३ श्ेळ्या मृत्यूशी झुंज देत आहे. दुष्काळात केवळ चारा नसल्याने त्यांच्या नशिबी तेरावा महिना आला आहे. अंदाजे लाखभर रूपये किंमतीच्या मोठ्या शेळ्या दगावल्या आहेत. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी यासाठी अख्खं कुटुंब हंबरडा फोडत होते.शवविच्छेदनासाठी टोलवाटोलवीमितीन चव्हाण यांच्या शेळ्या विषबाधेने रविवारी दुपारी दगावल्याचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी अनिकेत म्हसे यांना फोनवर सांगूनही देखील ‘मी नगरला आहे, उद्या सकाळी येतो’ असे म्हणत घटनेचे कसलेच गांभीर्य न घेता टोलवाटोलवी केली. त्यामुळे वरिष्ठांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पँथर जिल्हाध्यक्ष रूपेश बोराडे यांनी केली.वचक नसल्याने शेतकरी त्रस्तआष्टी तालुक्यात दोन आमदार, एक जि.प. अध्यक्ष, एक महिला बालकल्याण सभापती, सात जि.प. सदस्य, पं.स.चे चौदा सदस्य व इतर अनेक राजकीय पदाधिकारी असताना शासकीय अधिकारी, कर्मचाºयांवर कसलाच वचक नसल्याने शेतकरी वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागते.

टॅग्स :Beedबीडfood poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यू