शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे ७४ टक्के लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:46 IST

सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री उज्वला योजना : जिल्ह्यात १ लाख ५७ हजार लाभार्थी, ग्रामीण भागात दिल्या जाणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री अधिकारी केतन कर्णिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी योजनेतील बदल व ग्राहकांच्या सुलभ सुविधेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेविषयी माहिती दिली.कर्णिक म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना उज्वला योजनेमुळे मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्श्न घेता आले आहेत. त्यामुळे महिला स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्याऐवजी गॅसचा वापर करु लागल्या आहेत. १ मे २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास ७४ टक्के नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, गॅस वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सुलभ सुविधा देण्यासाठी कंपनीच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.अनेक नागरिकांना १४ किलो सिंलेंडरची किंमत परवडणारी नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी ५ किलोचे सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश शेतक री किंवा मजूर वर्ग आहे, त्यांच्या सुविधेसाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस ते घरी असताना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापुर्वी ३१ गॅस एजन्सी कार्यरत होत्या. आता शिरुर व पाटोदा येथेही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गॅस वापराबाबत ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे कर्णीक यांनी यावेळी सांगीतले.मार्गदर्शन सेवा : अपघात टाळण्यासाठी मोफत सुविधागॅस वापराबाबत सुरुवातीलाच महिलांना व घरातील इतर सदस्यांना माहिती दिली जाते.गॅस अपघात टाळण्यासाठी रेग्यूलेटर बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर देखील गॅसचा वास आला तर तत्काळ नागिरकांनी १९०६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, त्यानंतर नजिकच्या एजन्सीवरील कामगार भेट देऊन दुरुस्ती करतील.नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व धूरामुळे होणाऱ्या आजारापासून दूर रहावे असे आवाहन केतन कर्णिक यांनी केले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक