शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे ७४ टक्के लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:46 IST

सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री उज्वला योजना : जिल्ह्यात १ लाख ५७ हजार लाभार्थी, ग्रामीण भागात दिल्या जाणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंपाकासाठी लाकडे जाळू नये तर एलपीजीचा वापर करावा यासाठी राबविलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ग्राहकांना लाभ देण्यात आला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री अधिकारी केतन कर्णिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी योजनेतील बदल व ग्राहकांच्या सुलभ सुविधेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेविषयी माहिती दिली.कर्णिक म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना उज्वला योजनेमुळे मोठ्या प्रमाणात गॅस कनेक्श्न घेता आले आहेत. त्यामुळे महिला स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्याऐवजी गॅसचा वापर करु लागल्या आहेत. १ मे २०१६ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास ७४ टक्के नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, गॅस वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सुलभ सुविधा देण्यासाठी कंपनीच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.अनेक नागरिकांना १४ किलो सिंलेंडरची किंमत परवडणारी नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी ५ किलोचे सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश शेतक री किंवा मजूर वर्ग आहे, त्यांच्या सुविधेसाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस ते घरी असताना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापुर्वी ३१ गॅस एजन्सी कार्यरत होत्या. आता शिरुर व पाटोदा येथेही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गॅस वापराबाबत ग्रामीण भागात अजूनही गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी किंवा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे कर्णीक यांनी यावेळी सांगीतले.मार्गदर्शन सेवा : अपघात टाळण्यासाठी मोफत सुविधागॅस वापराबाबत सुरुवातीलाच महिलांना व घरातील इतर सदस्यांना माहिती दिली जाते.गॅस अपघात टाळण्यासाठी रेग्यूलेटर बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर देखील गॅसचा वास आला तर तत्काळ नागिरकांनी १९०६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, त्यानंतर नजिकच्या एजन्सीवरील कामगार भेट देऊन दुरुस्ती करतील.नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व धूरामुळे होणाऱ्या आजारापासून दूर रहावे असे आवाहन केतन कर्णिक यांनी केले.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक