शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

७ लाख नागरिकांचा पाणीप्रश्न ऐरणीवर; मांजरा धरणात केवळ ५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 7:29 PM

अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंबसह आसपासच्या खेड्यापाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुरेसा साठा झालेला नाही.

ठळक मुद्दे पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्या आहेत पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्याने

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई, लातूर, केज, धारूर, कळंबसह आसपासच्या खेड्यापाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुरेसा साठा झालेला नाही. परिणामी आगामी काळात सात लाख नागरिकांची तहान भागवायची कशी? हा मोठा प्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पर्यायी योजनांही कमकुवत ठरू लागल्याने आगामी काळात पाऊस न पडल्यास पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावणार आहे.  

अंबाजोगाई व परिसरात जूनच्या प्रारंभीपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्या झाल्या मात्र, पाणीसाठा वाढला जाईल, असा एकही पाऊस जून व जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत झालेला नाही. आष्टी, पाटोदा, मांजरसुंबा या परिसरात मुसळधार पाऊस झाला तरच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होते. मात्र, गत वर्षी मोठा पाऊस झाल्याने धरण भरले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेले पाणी व धरणावर अवलंबून असेल्या पाणीपुरवठा योजना यामुळे पाणीसाठा १०० वरुन ५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. ९५ टक्के पाण्याचा वापर वर्षभरात झाला. आतापर्यंत झालेल्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने जमिनीवरुन पाणी अद्यापतरी वाहिले नाही. परिणामी मांजरा धरणातील पाणीसाठा अद्यापही वाढलेला नाही. 

अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्याची मोठी भिस्त मांजरा धरणावरच आहे. साठा संपत आल्याने धरणातून पाणीपुरवठा कधी ठप्प होईल याची अंबाजोगाईकरांना धास्ती आहे. शहरासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काळवटी साठवण तलावाचा आधार आहे. मात्र, अत्यल्प पावसामुळे या धरणात केवळ ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध असलेले पाणी कसेबसे तीन ते चार महिने शहरवासियांना देता येईल. दरम्यान, दोन महिन्यांचा पावसाळा लोटला तरी एकदाही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले आहेत. ग्रामीण भागातही परिस्थिती पावसाअभावी दयनीय बनल्याचे दिसून येत आहे. आता उरलेल्या नक्षत्रांत किंवा परतीचा  मोठा पाऊस न झाल्यास अंबाजोगाईकरांना पाणीप्रश्न तीव्रतेने भेडसावणार आहे.

धरणात केवळ ५.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठामांजरा धरणात सध्या ५.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून, पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला आहे.धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शेती अथवा इतर बाबींना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.

मांजराच्या भोवतालचे प्रकल्पही कोरडेठाकमांजरा धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी डोकेवाडा, अप्परमांजरा, वाघेबाभूळगाव, महासांगवी हे प्रकल्प भरणे गरजेचे असते. हे प्रकल्प तुडुंब भरल्यानंतरच  पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात येतो.अद्यापपर्यंत अत्यल्प झालेल्या पावसामुळे हे प्रकल्पच भरले नाहीत. परिणामी धरणाकडे येणारा पाण्याचा प्रवाह अद्यापतरी सुरू झाला नाही. हे प्रकल्प भरल्यानंतर धरणातील पाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीAmbajogaiअंबाजोगाई