शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

By सोमनाथ खताळ | Updated: May 27, 2025 12:41 IST

बीड पोलिसांकडून समुपदेशन; पाच महिन्यांत १७४ विवाहितांच्या पोलिसांत तक्रारी

बीड : तू दिसायला चांगलीच नाहीस, तुला काही येत नाही, तुझ्या आई-वडिलांनी हुंडाच दिला नाही, यांसारख्या कारणांनी १७४ विवाहितांनी पोलिसांकडे धाव घेतली. यात समुपदेशन करून ६६ जणींचे संसार जोडण्यात आले. तर, आणखी १०८ जणींना पोलिसांकडून ‘भरोसा’ मिळणे बाकी आहे. तडजोड झालेल्या प्रकरणांतील अनेक विवाहितांनी आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, पोलिसांनी ‘भरोसा’ दिल्याने त्या मृत्यूच्या दारातून परत आल्या आहेत.

सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली होती. यातील आरोपी हे राजकीय असल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले. विरोधकांनीही टीका केली, परंतु अशाच वैष्णवी प्रत्येक जिल्ह्यात सासरच्या छळाला वैतागल्या आहेत. त्यामुळेच त्या पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेतात. बीडमध्ये अशा विवाहितांसाठीच भरोसा सेल कार्यरत आहे.

काय करतोय भरोसा सेल ?विवाहितांची तक्रार घेतली जाते. त्यानंतर आठवडाभरात तिच्या पतीसह सासरच्या लोकांना बोलावून घेतले जाते. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर दोघांनाही बोलावले जाते. समोरासमोर बसवून समस्या जाणून घेत समुपदेशन केले जाते. अनेक प्रकरणात पहिल्याच तारखेत तडजोड होते. तर काही प्रकरणात चार पाच वेळा बोलावून घेतल्यावर तडजोड होते. ज्यात होत नाही, अशावेळी विवाहिताला पत्र देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पाठविले जाते.

काय आहेत कारणे ?तुला स्वयंपाक बनवता येत नाही, तुला मुलच होत नाही, तू काळीच आहेस, घर बांधण्यासाठी, व्यावसायासाठी, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, लग्नात हुंडाच दिला नाही, मानपान दिला नाही, तुझे बाहेर अनैतिक संंबंध आहेत, तू फोनवरच सारखे बोलतेस, तू मोबाइल वापरू नकोस, तू आई-वडिलांना बोलायचेच नाहीस, तू माझ्या आई-वडिलांना मानपान देत नाहीस, उलटच का बोलतेस? असे विविध कारणे विवाहितांच्या छळाची आहेत.

विवाहिता का करतात आत्महत्या?सासरच्या लोकांचा सततचा त्रास आणि माहेरच्या लोकांना त्रास नको, म्हणून विवाहिता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलात. परंतु, असे न करता छळ होत असल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे तक्रार करावी. येथे समुपदेशनाने तडजोड केली जाते. यामुळे अनेक विवाहिता आत्महत्याचा विचार डोक्यातून काढत असल्याचे सांगण्यात आले.

पोलिस २४ तास तत्परभरोसा सेलमध्ये तक्रार येताच दोघांना बोलावून घेत समुपदेशन केले जाते. त्यांच्यात तडजोड व्हावी, हाच पोलिसांचा उद्देश असतो. यात आम्हाला यश येत आहे. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. प्रत्येक समस्याला मार्ग असतो. पोलिस आपल्यासाठी २४ तास तत्पर आहे.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

२०२५ मधील आकडेवारीएकूण अर्ज १७४तडजोड - ६६प्रलंबित - १०८

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याsexual harassmentलैंगिक छळdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदा