शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

ऐन पावसाळ््यात सुरु होणार ६५० टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:40 IST

जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा; पाणीपुरवठा करणारे सर्व प्रकल्प कोरडेठाक

बीड : जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात पाणीपुरवठा करण्यासाठी ६५० टँकर सुरु होणार आहेत.एप्रिल ते जून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याचा प्रश्न गंभीर होता. त्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ९०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यान दुष्काळी कालावधी संपल्यामुळे व जून महिन्याच्या शेवटी तरी मोठा पाऊस पडेल ही अपेक्षा असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र, जुलै महिन्याची १३ तारीख आली तरी देखील मोठा पाऊस न झाल्यामुळे, पुन्हा ग्रामीण भागातून टँकरची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांमधून टँकरची आवश्यकतेनुसार मागणीचे प्रस्तवा मागवले होते. त्यानूसार सर्व तालुक्यांनी पुन्हा एकदा जवळपास ६५० टँकरची मागणी केली आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भर पावसाळ््यात ६५० टँकर सुरु होणार आहेत. तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे सर्व छोटी- मोठी धरणे देखील कोरडी पडली आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना कायम आहे.भविष्यकाळाची घोर चिंताजिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे छोटे-मोठे १४४ प्रकल्प कोरडेठाक आहेत. माजलगाव धरणात गोदापात्रातून पाणी येण्याची शक्यता आहे. मात्र, इतर ठिकाणी नद्या कोरड्या असल्यामुळे मोठा पाऊस पडेपर्यंत प्रकल्प कोरडेठाक राहणार आहेत. मोठा पाऊस पडला नाही तर पुढील काळात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई