शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

बीड जिल्ह्यात चारा पिकांमध्ये १० वर्षांत ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:47 IST

जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देनगदी पिकांचा पेरा वाढल्याने : चारा टंचाईचा करावा लागतोय सामना

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच पेरा कमी झाल्यामुळे ज्वारी, बाजरीसह इतर धान्याचे भाव देखील वाढले आहेत.बीड जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ८ लाख ६६ हजार २२५ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील लागवडीखाली ७ लाख २७ हजार ५२३ हेक्टर एवढे आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचा पेरा वाढल्यामुळे इतर पारंपारिक पिकांचा पेरा घटला आहे. २००९ ते २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ४५ ते ५० घट खरीप व रब्बी ज्वारी, मका व इतर पारंपारिक पिक लागवडीमध्ये घट झाली आहे. मागील दहा वर्षात दर एका वर्षाआड पडणारा दुष्काळ व बदललेली पिकपद्धती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील पशुधन १२ लाखाच्या जवळापास आहे. मात्र, चारा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी ६०३ चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत.मागील १० वर्षात बदलेल्या पिकपद्धतीमुळे शेतीची उत्पादनक्षमता देखील कमी होत असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नगदी पिकांमुळे शेतीला पुरक असलेला दूध व्यवसाय संपुष्टात आला आहे. तसेच उत्पादन क्षमता व पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळेव शेतीच्या कमासाठी यंत्राचा वापर वाढल्यामुळे जनावरे कमी झाले आहेत. त्यामुळे चारा व इतर पारंपारिक पिकांना फाटा देऊन नगदी पिकांच्या पेरा अधिक होत आहे. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळत आहे. तसेच बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा कमी होत असल्यामुळे किंमत वाढ आहे. याचा परिणाम नागरिकांच्या धान्य खरेदीवर होत आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी पारंपारिक पिकांचा पेरा केला पाहिजे असे मत कृषी विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले.शेतकºयांची आर्थिक स्थिती बिघडलीपुर्वी पाशुधन पुरक पिकपद्धती होती मात्र, मागील काही वर्षात जनावरांची संख्या घटली व नगदी पिके घेण्यावर भर दिला गेला आहे.त्यामुळे शेणखतातून मिळणारे मुलद्रव्य कमी झाले व त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.त्यामुळे शेतकºयांनी शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसाय केला पाहिजे तसेच पुन्हा एक दा नवतंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपारिक पिकपद्धतीचा अवलंब देखील करणे गरजेचे आहे.यामुळेच शेतीमधील उत्पादन वाढेल व शेतकरी समृद्ध होईल असे मत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ