शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

बीड जिल्ह्यात चारा पिकांमध्ये १० वर्षांत ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:47 IST

जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देनगदी पिकांचा पेरा वाढल्याने : चारा टंचाईचा करावा लागतोय सामना

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच पेरा कमी झाल्यामुळे ज्वारी, बाजरीसह इतर धान्याचे भाव देखील वाढले आहेत.बीड जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ८ लाख ६६ हजार २२५ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील लागवडीखाली ७ लाख २७ हजार ५२३ हेक्टर एवढे आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचा पेरा वाढल्यामुळे इतर पारंपारिक पिकांचा पेरा घटला आहे. २००९ ते २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ४५ ते ५० घट खरीप व रब्बी ज्वारी, मका व इतर पारंपारिक पिक लागवडीमध्ये घट झाली आहे. मागील दहा वर्षात दर एका वर्षाआड पडणारा दुष्काळ व बदललेली पिकपद्धती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील पशुधन १२ लाखाच्या जवळापास आहे. मात्र, चारा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी ६०३ चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत.मागील १० वर्षात बदलेल्या पिकपद्धतीमुळे शेतीची उत्पादनक्षमता देखील कमी होत असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नगदी पिकांमुळे शेतीला पुरक असलेला दूध व्यवसाय संपुष्टात आला आहे. तसेच उत्पादन क्षमता व पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळेव शेतीच्या कमासाठी यंत्राचा वापर वाढल्यामुळे जनावरे कमी झाले आहेत. त्यामुळे चारा व इतर पारंपारिक पिकांना फाटा देऊन नगदी पिकांच्या पेरा अधिक होत आहे. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळत आहे. तसेच बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा कमी होत असल्यामुळे किंमत वाढ आहे. याचा परिणाम नागरिकांच्या धान्य खरेदीवर होत आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी पारंपारिक पिकांचा पेरा केला पाहिजे असे मत कृषी विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले.शेतकºयांची आर्थिक स्थिती बिघडलीपुर्वी पाशुधन पुरक पिकपद्धती होती मात्र, मागील काही वर्षात जनावरांची संख्या घटली व नगदी पिके घेण्यावर भर दिला गेला आहे.त्यामुळे शेणखतातून मिळणारे मुलद्रव्य कमी झाले व त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.त्यामुळे शेतकºयांनी शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसाय केला पाहिजे तसेच पुन्हा एक दा नवतंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपारिक पिकपद्धतीचा अवलंब देखील करणे गरजेचे आहे.यामुळेच शेतीमधील उत्पादन वाढेल व शेतकरी समृद्ध होईल असे मत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ