शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांनी प्रॉपर्टी हडप करुनही भगवानगडाकडे ४०० एकर जमीन: महंत नामदेव शास्त्री 

By अनिल लगड | Updated: September 12, 2022 13:47 IST

भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली.

बीड : संत भगवानबाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या सहकार्याने भगवानगडाचा विकास सुरू आहे. मागील काळात औरंगाबाद येथील भगवानगडाची प्रॉपर्टी काहींनी हडप केली. परंतु भाविकांची अपार श्रध्दा, त्यांनी केलेली मदत व सहकार्यामुळे भगवानगडाला काही फरक पडला नाही. आजही  भगवान गडाकडे ३५० ते ४०० एकर जमीन शिल्लक आहे, असे वक्तव्य महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.   गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सुधाकर महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी महंत शास्त्री यांची ग्रामस्थांनी रथातून मिरवणूक काढली होती. यावेळी महंत शास्त्री बोलत होते.संत भगवान बाबा चकलंब्यात घोड्याच्या तांग्यानी यायचे आणि चकलांब्यातून पुढे बसने जायचे. भगवान बाबांच्या इतक्या जवळचे गाव मधल्या काही काळात थोडे दूर झाले होते. पण आज तो सर्व दुरावा तुम्ही गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन भरून काढला, असे बोलून महंत शास्त्रींनी तरुणांसह गावकऱ्यांचे कौतुक केले. 

संत भगवानबाबांचे औरंगाबाद येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक विश्वासू सहकारी  होते. आज ते हयात नाहीत. त्यांच्यावर इतका विश्वास होता की, ते शिकत असताना त्यांनी बाबांना घड्याळ मागितले होते. यावेळी भगवानबाबांनी स्वत:च्या हातातील घड्याळ लगेच काढून त्यांना दिले होते. यानंतर  ‘ते’ सहकारी गडाचे विश्वस्त झाले. भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली. तरीही गडाला काहीही फरक पडला नाही. आजही गडाकडे भरपूर जमीन शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जागाही हडपण्याचा प्रयत्न काही दिवसापूर्वी झाला होता. परंतु तो प्रयत्न तेथील भाविकांनी हाणून पाडला, असेही महंत शास्त्री यांनी यावेळी सांगितले. भगवान गडावर अशी अनेक संकटे आली. तरी ती बाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या मदत व सहकार्याने ती दूर झाली. यामुळे आजही भगवानगडाची विकासाकडे वाटचाल आहे, असेही शास्त्री म्हणाले.

गरज पडेल तेव्हा चकलांब्याचा निधी घेईलभगवान गडाच्या विकास कामासाठी चकलांबा ग्रामस्थांची विकास निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु नामदेव शास्त्री यांनी सांगितले की, आता नको. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस घेईल, असे सांगितले.

टॅग्स :Beedबीडsocial workerसमाजसेवक