शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

अनेकांनी प्रॉपर्टी हडप करुनही भगवानगडाकडे ४०० एकर जमीन: महंत नामदेव शास्त्री 

By अनिल लगड | Updated: September 12, 2022 13:47 IST

भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली.

बीड : संत भगवानबाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या सहकार्याने भगवानगडाचा विकास सुरू आहे. मागील काळात औरंगाबाद येथील भगवानगडाची प्रॉपर्टी काहींनी हडप केली. परंतु भाविकांची अपार श्रध्दा, त्यांनी केलेली मदत व सहकार्यामुळे भगवानगडाला काही फरक पडला नाही. आजही  भगवान गडाकडे ३५० ते ४०० एकर जमीन शिल्लक आहे, असे वक्तव्य महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.   गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सुधाकर महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी महंत शास्त्री यांची ग्रामस्थांनी रथातून मिरवणूक काढली होती. यावेळी महंत शास्त्री बोलत होते.संत भगवान बाबा चकलंब्यात घोड्याच्या तांग्यानी यायचे आणि चकलांब्यातून पुढे बसने जायचे. भगवान बाबांच्या इतक्या जवळचे गाव मधल्या काही काळात थोडे दूर झाले होते. पण आज तो सर्व दुरावा तुम्ही गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन भरून काढला, असे बोलून महंत शास्त्रींनी तरुणांसह गावकऱ्यांचे कौतुक केले. 

संत भगवानबाबांचे औरंगाबाद येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक विश्वासू सहकारी  होते. आज ते हयात नाहीत. त्यांच्यावर इतका विश्वास होता की, ते शिकत असताना त्यांनी बाबांना घड्याळ मागितले होते. यावेळी भगवानबाबांनी स्वत:च्या हातातील घड्याळ लगेच काढून त्यांना दिले होते. यानंतर  ‘ते’ सहकारी गडाचे विश्वस्त झाले. भगवानबाबांच्या नंतर भिमसिंह महाराजांच्या काळात या विश्वताने काही जणांना हाताशी धरून औरंगाबाद येथील भगवानगडाची जमिनीसह तेथील शैक्षणिक प्रॉपर्टी हडप केली. तरीही गडाला काहीही फरक पडला नाही. आजही गडाकडे भरपूर जमीन शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जागाही हडपण्याचा प्रयत्न काही दिवसापूर्वी झाला होता. परंतु तो प्रयत्न तेथील भाविकांनी हाणून पाडला, असेही महंत शास्त्री यांनी यावेळी सांगितले. भगवान गडावर अशी अनेक संकटे आली. तरी ती बाबांच्या आशीर्वादाने व भाविकांच्या मदत व सहकार्याने ती दूर झाली. यामुळे आजही भगवानगडाची विकासाकडे वाटचाल आहे, असेही शास्त्री म्हणाले.

गरज पडेल तेव्हा चकलांब्याचा निधी घेईलभगवान गडाच्या विकास कामासाठी चकलांबा ग्रामस्थांची विकास निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु नामदेव शास्त्री यांनी सांगितले की, आता नको. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस घेईल, असे सांगितले.

टॅग्स :Beedबीडsocial workerसमाजसेवक