शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

३५१ छावण्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : आठ दिवसांत खुलासा करण्याचे प्रशासनाचे आदेश

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील ३५१ चारा छावण्यांना नोटीस देण्यात आली असून ८ दिवसांत योग्य खुलासा न दिल्यास चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाने मोर्चा आता दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी वळवला आहे. छावण्यांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमनूक करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. तर काही ठिकाणी अधिकारी चिरीमिरी घेऊन योग्य तपासणी करत नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकारी स्वत: लक्ष घालून चारा छावण्यांची तपासणी करणार आहेत. नियमांनूसार छावणीवर व्यवस्था करण्यात आलेली नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनावरांची संख्या कमी असताना जास्तीचा अहवाल पाठवणे, एक दिवसाआड पशुखाद्याचे वाटप न करणे, योग्य नोंदी नसणे, जनावरांवर नंबर नसणे यासह इतर त्रूटी आढळून आल्यामुळे ३५१ चारा छावणी चालकांना नोटीस दिली आहे. तसेच ८ दिवसांमध्ये योग्य खुलासा न दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या छावण्यांना अधिकाऱ्यांकडून अभयचारा छावण्यांचे चालक हे बहूतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाºयांकडून कार्यवाही केली जात नाही.अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी काही दिवसांपुर्वी म्हाळस जवळा, मांजरसुंबा, आष्टी, शिरुर, येथील काही चारा छावण्यांची तपासणी केली होती. त्यावेळी जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. मात्र, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे पदाधिका-यांच्या छावण्यांना वेगळा नियम प्रशासकीय अधिकाºयांनी लावला आहे का असा प्रश्न इतर चारा छावणी चालक विचारु लागले आहेत.तहसीलदारांचा अजब फतवाशिरुरच्या तहसीलदारांनी आदेश काढून तलाठ्यांनी चारा छावण्या तपासायच्या नाहीत असा अजब फतवा काढला होता.त्यांनी काही चारा छावण्याची तपासणी केली तेथे सर्व व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. तर त्याच छावणीची अपर जिल्हाधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर १५६ पेक्षा अधिक जनावरांची तफावत दिसून आली.त्यामुळे काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाºयांना छावण्यांमधून भ्रष्टाचाराचे कुरण मिळाले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र