शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

३५१ छावण्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : आठ दिवसांत खुलासा करण्याचे प्रशासनाचे आदेश

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील ३५१ चारा छावण्यांना नोटीस देण्यात आली असून ८ दिवसांत योग्य खुलासा न दिल्यास चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाने मोर्चा आता दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी वळवला आहे. छावण्यांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमनूक करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. तर काही ठिकाणी अधिकारी चिरीमिरी घेऊन योग्य तपासणी करत नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकारी स्वत: लक्ष घालून चारा छावण्यांची तपासणी करणार आहेत. नियमांनूसार छावणीवर व्यवस्था करण्यात आलेली नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनावरांची संख्या कमी असताना जास्तीचा अहवाल पाठवणे, एक दिवसाआड पशुखाद्याचे वाटप न करणे, योग्य नोंदी नसणे, जनावरांवर नंबर नसणे यासह इतर त्रूटी आढळून आल्यामुळे ३५१ चारा छावणी चालकांना नोटीस दिली आहे. तसेच ८ दिवसांमध्ये योग्य खुलासा न दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या छावण्यांना अधिकाऱ्यांकडून अभयचारा छावण्यांचे चालक हे बहूतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाºयांकडून कार्यवाही केली जात नाही.अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी काही दिवसांपुर्वी म्हाळस जवळा, मांजरसुंबा, आष्टी, शिरुर, येथील काही चारा छावण्यांची तपासणी केली होती. त्यावेळी जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. मात्र, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे पदाधिका-यांच्या छावण्यांना वेगळा नियम प्रशासकीय अधिकाºयांनी लावला आहे का असा प्रश्न इतर चारा छावणी चालक विचारु लागले आहेत.तहसीलदारांचा अजब फतवाशिरुरच्या तहसीलदारांनी आदेश काढून तलाठ्यांनी चारा छावण्या तपासायच्या नाहीत असा अजब फतवा काढला होता.त्यांनी काही चारा छावण्याची तपासणी केली तेथे सर्व व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. तर त्याच छावणीची अपर जिल्हाधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर १५६ पेक्षा अधिक जनावरांची तफावत दिसून आली.त्यामुळे काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाºयांना छावण्यांमधून भ्रष्टाचाराचे कुरण मिळाले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र