शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

३५१ छावण्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : आठ दिवसांत खुलासा करण्याचे प्रशासनाचे आदेश

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील ३५१ चारा छावण्यांना नोटीस देण्यात आली असून ८ दिवसांत योग्य खुलासा न दिल्यास चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाने मोर्चा आता दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी वळवला आहे. छावण्यांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमनूक करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. तर काही ठिकाणी अधिकारी चिरीमिरी घेऊन योग्य तपासणी करत नसल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकारी स्वत: लक्ष घालून चारा छावण्यांची तपासणी करणार आहेत. नियमांनूसार छावणीवर व्यवस्था करण्यात आलेली नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनावरांची संख्या कमी असताना जास्तीचा अहवाल पाठवणे, एक दिवसाआड पशुखाद्याचे वाटप न करणे, योग्य नोंदी नसणे, जनावरांवर नंबर नसणे यासह इतर त्रूटी आढळून आल्यामुळे ३५१ चारा छावणी चालकांना नोटीस दिली आहे. तसेच ८ दिवसांमध्ये योग्य खुलासा न दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या छावण्यांना अधिकाऱ्यांकडून अभयचारा छावण्यांचे चालक हे बहूतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाºयांकडून कार्यवाही केली जात नाही.अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी काही दिवसांपुर्वी म्हाळस जवळा, मांजरसुंबा, आष्टी, शिरुर, येथील काही चारा छावण्यांची तपासणी केली होती. त्यावेळी जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. मात्र, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे पदाधिका-यांच्या छावण्यांना वेगळा नियम प्रशासकीय अधिकाºयांनी लावला आहे का असा प्रश्न इतर चारा छावणी चालक विचारु लागले आहेत.तहसीलदारांचा अजब फतवाशिरुरच्या तहसीलदारांनी आदेश काढून तलाठ्यांनी चारा छावण्या तपासायच्या नाहीत असा अजब फतवा काढला होता.त्यांनी काही चारा छावण्याची तपासणी केली तेथे सर्व व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. तर त्याच छावणीची अपर जिल्हाधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर १५६ पेक्षा अधिक जनावरांची तफावत दिसून आली.त्यामुळे काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाºयांना छावण्यांमधून भ्रष्टाचाराचे कुरण मिळाले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र