शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

बीडच्या ३० समस्या अन् प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; शिवसेना जिल्हाप्रमुखांनी मांडल्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 14:06 IST

यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले.

बीड : मागासलेला जिल्हा अशी ओळख बीडची आहे. ती पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. अशाच ३० मुद्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यात जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पाणी, वीज, रस्ता, आरोग्य आदी मुद्यांची मांडणी केली.

सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी साठवण तलाव आणि बंधारे उभारल्यास शेतकरी स्वावलंबी आणि समाधानी होईल. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. शेतीमाल साठवण्यासाठी शासकीय शीतगृह उपलब्ध करून देण्यात यावेत. फळ संशोधन केंद्र उभारण्यात यावे. मंजूर झालेल्या सिताफळ संशोधन केंद्राला निधी आणि जास्तीचे अधिकार देण्यात यावेत. मत्स्य उद्योग भराभराटीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, अतिरिक्त ऊस गाळपासाठी नियोजन लावण्यात यावे नसता शेतकऱ्याना अनुदान देण्यात यावे. शेततळ्यांसाठी अनुदान वाढवावे, शेत तिथे रस्ता यासाठी जास्तीचा निधी द्यावा. बालाघाट डोंगरामध्ये सौर ऊर्जा, सोलार योजनेला प्रोत्साहन देण्यात यावे. वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अभ्यासासाठी मार्गदर्शन केंद्र आणि अत्याधुनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. आरोग्य सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालयांची संख्या वाढवावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या अपुरी पडत आहे. २०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, अजून १०० खाटांचे रुग्णालय याच ठिकाणी होणे आवश्यक आहे. नगर ते परळी रेल्वे मार्गाचे काम मंद गतीने आहे. राज्य सरकारने ठरलेला हिस्सा तातडीने देऊन या रेल्वे मार्गाला गतिमान करावे. कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक देण्यात यावे. पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना आणि भाविकांना बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करण्यात यावे, आदी मुद्यांची मांडणी बीड शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली. यातील बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले.

शिवसेनेचा सामाजिक प्रश्नांवर भर जिल्हाप्रमुखांची मुंबईत बैठक झाली आहे. यात आपण जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे असणारे प्रश्न व समस्यांचे ३० मुद्दे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यातील बहुतांश मुद्दे साेडविण्याचे अश्वासनही दिले आहे. बीड जिल्हा शिवसेनेच्यावतीने सामाजिक प्रश्नांवर जास्त भर दिला जात आहे.- अनिल जगताप, जिल्हाप्रमुख शिवसेना

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरे