शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

‘ते’२७९ गुरुजीसध्या तरी बीडमध्ये कार्यरत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:39 IST

जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले होते

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी कार्यमुक्त केले होते. दरम्यान शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सध्या तरी या शिक्षकांना कार्यरत ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.१७ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर २७९ शिक्षकांनी उपोषण सुरु केले होते. दरम्यान याच दिवशी सायंकाळी त्यांना ग्रामविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासित केले होते. मात्र त्यानंतर शासनाचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला शाळा सुरु होऊनही २६ नोव्हेंबरपर्यंत मिळालेले नव्हते. त्यामुळे कार्यमुक्ती की स्थगिती याबाबत संभ्रम कायम होता.तर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी २७९ शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्हयात जाण्यासाठी कार्यमुक्त केले होते. सदोष बिंदूनामावलीचा आधार घेत हे आदेश दिल्याचा संदर्भ देत त्याविरूध्द शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागितली होती. शिक्षकांच्या कार्यमुक्तीमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेवून यांनी ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत शिक्षक प्रतिनिधींची तातडीने बैठक घेवून कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मुंडे यांनी आदेश दिल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिका-यांना लेखी पत्र पाठवून त्या २७९ शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून आणि शिक्षकां अभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्यातरी या पदावर संबंधित शिक्षकांना कार्यरत ठेवण्यात यावे असेही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे हे शिक्षक सध्यातरी कार्यमुक्त होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. २७९ शिक्षकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzpजिल्हा परिषद