शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

बीडमध्ये वसतिगृहातील २२ मुलांना विषबाधा

By सचिन धर्मापुरीकर | Updated: July 5, 2019 16:58 IST

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

बीड : केज तालुक्यातील शिरूर घाट येथील एका वसतिगृहातील २२ मुलांना खाद्यपदार्थामधून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली. त्यांच्यावर नांदूरघाट येथील आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंर पुढील उपचारासाठी ८ विद्यार्थांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात रात्रीच दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

योगेश्वरी मुलांचे बालग्राम हे वसतीगृह आहे. त्या ठिकाणी ३०० ते ३५० मुले वास्तव्यास आहेत. ते सर्व विद्यार्थी पीटी (ता. केज) येथील स्व.चांगदेवराव तांबडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षण घेतात. या ठिकाणी वास्तव्यास असणारी मुले जिल्ह्यातील विविध गावातून येतात. वसतीगृहावर राहत असल्यामुळे घरून आणलेला फराळ ते खातात. बुधवारी दुपारी यातील २२ मुलांनी मुरमुरे, चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळे हे पदार्थ खाल्ले. त्यामधून त्यांना विषबाधा झाली असल्याचे मुलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर नांदूर येथील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णालयातून गुरुवारी दुपारच्या सुमारास सर्वांना सुटी देण्यात आली. वसतीगृहात राहणारे अविनाश ढाकणे, आदित्य नवले, अमर अवटे, ओम जाधव, कृष्णा काळे, सुमित काळे दिपक काळे, ओंकार आडे या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे. संस्थाचालकाने पालकांना विषबाधेविषयी माहिती दिलेली नव्हती. 

संस्थाचालकाची टाळाटाळयोगेश्वरी मुलांचे बालग्राम व विद्यालयाच्या संस्थाचालकाशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा मोबाईल नंबर न देता रुग्णालयातून संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या फोनवर ते बोलले, त्यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच नाव सांगण्यास देखील नकार दिला. मुलांच्या पालकांना कळवले आहे का, असे विचारल्यानंतर मुलांवरील उपचारानंतर माहिती देणार होतो, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा