शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बीड जिल्ह्यात अकरा महिन्यामध्ये १७० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती व नापिकी : शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळेच आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. हे आत्महत्येचे सत्र थांबवण्यासाठी शासन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, मगील काही वर्षांपासून सुरु असलेले शेतकरी आत्महत्या सत्र थांबवण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात १७० शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.जिल्ह्यात पावासाचे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. त्यामुळे कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर योग्यरित्या होत नसल्यामुळे शेतकºयांना त्याचा लाभ मिळत नाही. मात्र, कागदोपत्री त्या योजना राबवल्याचे दिसून येते.अशाच प्रकारे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली बांधबंदिस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केल्याचे कागदोपत्री दिसते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी कामे न करता बोगस बिले उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची चौकशी देखील सुरु असून, परळी जलयुक्त घोटाळा प्रकरणी अनेक अधिकारी निलंबित झाले आहेत.त्यामुळे शेतकºयांसाठी राबवलेल्या योजना योग्य रीत्या राबवल्या जात नाहीत म्हणून आत्महत्या वाढल्याची प्रतिक्रिया बीड तालुक्यातील हिंगणी येथील शेतकरी सूरज बांगर यांनी दिली....तरच आत्महत्या सत्र थांबेल !४जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस आहे. मात्र, मागील हंगामामध्ये भाव नसल्यामुळे व यावर्षी बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांची मदत तीन टप्प्यात करण्यात आली. ती मदत शेतकºयांना तात्काळ मिळणे गरजेचे होते. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही बोंडअळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने राबवण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होऊन त्याचा लाभ खºया शेतकºयांना होणे गरजेचे आहे. तरच हे आत्महत्या सत्र थांबेल अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी दिली.शाश्वत पाणीसाठा निर्मितीची आवश्यकताजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार, नाम, पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी दर्जेदार झाली आहेत. त्याठिकाणी या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पाणीपातळीत घट झालेली नाही. मात्र, शासनाची जलयुक्त शिवार योजना योग्य राबवणे आवश्यक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या