शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

बीड जिल्ह्यात अकरा महिन्यामध्ये १७० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती व नापिकी : शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळेच आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. हे आत्महत्येचे सत्र थांबवण्यासाठी शासन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, मगील काही वर्षांपासून सुरु असलेले शेतकरी आत्महत्या सत्र थांबवण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात १७० शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.जिल्ह्यात पावासाचे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. त्यामुळे कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर योग्यरित्या होत नसल्यामुळे शेतकºयांना त्याचा लाभ मिळत नाही. मात्र, कागदोपत्री त्या योजना राबवल्याचे दिसून येते.अशाच प्रकारे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली बांधबंदिस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केल्याचे कागदोपत्री दिसते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी कामे न करता बोगस बिले उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची चौकशी देखील सुरु असून, परळी जलयुक्त घोटाळा प्रकरणी अनेक अधिकारी निलंबित झाले आहेत.त्यामुळे शेतकºयांसाठी राबवलेल्या योजना योग्य रीत्या राबवल्या जात नाहीत म्हणून आत्महत्या वाढल्याची प्रतिक्रिया बीड तालुक्यातील हिंगणी येथील शेतकरी सूरज बांगर यांनी दिली....तरच आत्महत्या सत्र थांबेल !४जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस आहे. मात्र, मागील हंगामामध्ये भाव नसल्यामुळे व यावर्षी बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांची मदत तीन टप्प्यात करण्यात आली. ती मदत शेतकºयांना तात्काळ मिळणे गरजेचे होते. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही बोंडअळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने राबवण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होऊन त्याचा लाभ खºया शेतकºयांना होणे गरजेचे आहे. तरच हे आत्महत्या सत्र थांबेल अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी दिली.शाश्वत पाणीसाठा निर्मितीची आवश्यकताजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार, नाम, पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी दर्जेदार झाली आहेत. त्याठिकाणी या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पाणीपातळीत घट झालेली नाही. मात्र, शासनाची जलयुक्त शिवार योजना योग्य राबवणे आवश्यक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या