शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

बीड जिल्ह्यात अकरा महिन्यामध्ये १७० शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती व नापिकी : शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळेच आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी या कारणांमुळे दरवर्षी शेकडो शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. हे आत्महत्येचे सत्र थांबवण्यासाठी शासन तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, मगील काही वर्षांपासून सुरु असलेले शेतकरी आत्महत्या सत्र थांबवण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात १७० शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.जिल्ह्यात पावासाचे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. त्यामुळे कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर योग्यरित्या होत नसल्यामुळे शेतकºयांना त्याचा लाभ मिळत नाही. मात्र, कागदोपत्री त्या योजना राबवल्याचे दिसून येते.अशाच प्रकारे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली बांधबंदिस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केल्याचे कागदोपत्री दिसते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी कामे न करता बोगस बिले उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची चौकशी देखील सुरु असून, परळी जलयुक्त घोटाळा प्रकरणी अनेक अधिकारी निलंबित झाले आहेत.त्यामुळे शेतकºयांसाठी राबवलेल्या योजना योग्य रीत्या राबवल्या जात नाहीत म्हणून आत्महत्या वाढल्याची प्रतिक्रिया बीड तालुक्यातील हिंगणी येथील शेतकरी सूरज बांगर यांनी दिली....तरच आत्महत्या सत्र थांबेल !४जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस आहे. मात्र, मागील हंगामामध्ये भाव नसल्यामुळे व यावर्षी बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांची मदत तीन टप्प्यात करण्यात आली. ती मदत शेतकºयांना तात्काळ मिळणे गरजेचे होते. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही बोंडअळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने राबवण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होऊन त्याचा लाभ खºया शेतकºयांना होणे गरजेचे आहे. तरच हे आत्महत्या सत्र थांबेल अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कालिदास अपेट यांनी दिली.शाश्वत पाणीसाठा निर्मितीची आवश्यकताजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार, नाम, पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी दर्जेदार झाली आहेत. त्याठिकाणी या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पाणीपातळीत घट झालेली नाही. मात्र, शासनाची जलयुक्त शिवार योजना योग्य राबवणे आवश्यक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या