शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

लॉकडाऊन काळातील १,६६१ गुन्हे होणार रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST

बीड : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंध काळात विविध कारणास्तव नियम तोडल्यामुळे जिल्ह्यात १,६६१ गुन्हे दाखल झाले होते. ...

बीड : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंध काळात विविध कारणास्तव नियम तोडल्यामुळे जिल्ह्यात १,६६१ गुन्हे दाखल झाले होते. या काळातील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी जिल्ह्यात यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश किंवा परिपत्रक मिळालेले नाही. त्यामुळे निर्णयानंतरदेखील १,६६१ गुन्हे रद्द कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने जिल्ह्यात सीमाबंदी आणि लॉकडाऊन जाहीर केला होता. या काळात नागरिकांनी घराबाहेर निघू नये, दुकान उघडे ठेवू नये यासह इतर निर्बंध नागरिकांवर घालण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात नागरिकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाददेखील दिला होता.

दरम्यान, अनेक जण नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही बाजारपेठेत दुकाने सुरू ठेवली जात होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने नियम मोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करीत विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते. या काळात जमावबंदी आदेश लागू होता. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी होती. या काळात वाहन घेऊन विनाकारण बाहेर प्रवास करणे, दुकान नियम डावलून सुरू ठेवणे यासह इतर नियम मोडणाऱ्या १,६६१ जणांवर विविध पोलीस ठाण्यांत कलम १८८ व इतर प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

तसेच लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत व्यवहार बंद न करता गर्दी झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांवरदेखील गुन्हे या काळात दाखल झाले होते. यापैकी काही प्रकरणे न्यायप्रविष्ट होऊन न्यायालयाने शिक्षादेखील सुनावली आहे. दरम्यान, आता हे गुन्हे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या काळात गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. मात्र, हा निर्णय सध्या शासनस्तरावर झाला असून, यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनास कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना गुन्हे रद्द होण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई

लॉकडाऊनच्या काळात शासनाने फिरण्यावरदेखील निर्बंध घातले होते. मात्र, काही जण विनाकारण दुचाकीवर फिरत होते. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. या काळात पोलीस व नागरिकांमध्ये काही ठिकाणी संघर्ष झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. अनेक पोलीस ठाण्यांत वाहनेदेखील जप्त करण्यात आली होती.

चेकपोस्टवर झाले होते गुन्हे दाखल

बीड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या अहमदनगर, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांच्या सीमा हद्दीवर चेकपोस्ट तयार करण्यात आले होते. त्या ठिकाणावरून नागरिकांनी जिल्ह्यात दाखल होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात होती.

या जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर उभारण्यात आलेल्या या चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जात होती. याठिकाणीदेखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, अशा स्वरूपाची कारणे होते.

राष्ट्रीय आपत्ती कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कार्यवाई करण्यात आली होती. आता हे गुन्हे रद्द करण्याचा निर्णय शासन दरबारी झाला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.