शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:46 IST

: उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली.

अंबाजोगाई (बीड ) : उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली.

यश नंदकुमार देशपांडे (वय १६) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आज मंगळवारी सकाळी तो अन्य दोन मित्रांसोबत कंपनी बाग परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पोहण्यात तरबेज नसल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. यावेळी तिथे पोहण्यासाठी आलेल्या शेख अफजल या तरुणाने विहिरीत उडी मारून बुडालेल्या यशला बाहेर काढले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असणाऱ्या यशला तातडीने जवळच असलेल्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

यश हा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार देशपांडे यांचा मुलगा होता. योगेश्वरी नूतन शाळेचा विद्यार्थी असलेल्या यशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तो एक उत्तम फुटबॉलपटू आणि निष्णात खो-खो खेळाडू होता अशी माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. अतिशय शांत स्वभावाच्या आणि शिक्षणासोबतच खेळातही अग्रेसर असलेल्या गुणी यशच्या अकाली मृत्यूने त्याचे नातेवाईक, शिक्षक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAmbajogaiअंबाजोगाईWaterपाणी