शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

छावणीचे १५६ प्रस्ताव दाखल; पण मंजूर एकही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:27 IST

तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातुन एकूण १५६ छावणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील स्थिती : पंचायत समितीकडे १०३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव दाखल तर ९५ टँकर मंजूर

अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातुन एकूण १५६ छावणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. परंतु अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातुन आलेले सर्व प्रस्ताव शासनाने मंजूर केले तर शेतकऱ्यांवर आलेले संकट काही प्रमाणात कमी होईल.आष्टी तालुक्यामध्ये आजमितीस ९५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर तालुकाभरातून १०३ टँकरचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी २२ प्रस्ताव मंजुरीसाठी कार्यालयात पडून आहेत. तालुक्यात यावेळी पर्जन्य कमी पडल्याने सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा, धामणगाव, पिंपळा, टाकळसिंग, दौलावडगाव या सात महसूल मंडळात पाणी व चाºयाचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. तालुक्यात गुरांची छावणी अद्याप पर्यंत झाली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी आपली जनावरे बाजारात विकली आहेत.छावणीविना जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाहीआमच्या गावात यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई आहे गावात टँकर सुरू आहे परंतु जनावरांना आम्ही चारा कोठून आणायचा शासनाने आमच्या मांडवा गावात छावणी सुरू केल्यास आमची जनावरे जगतील नाही तर विकल्याशिवाय पर्याय नाही, मांडवा येथील शेतकरी संतोष मुटकुळे म्हणाले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई