शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बीड जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकारी बदलून गेले; १५ नवे मिळाले  

By सोमनाथ खताळ | Updated: February 24, 2024 22:25 IST

त्यांच्या जागी  नवे १५ अधिकारी मिळाले आहेत. 

सोमनाथ खताळ, बीड : जिल्ह्यातील रहिवासी असलेले व जिल्ह्यात तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नऊ पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक असे १३ अधिकारी  बदलून गेले आहेत, तर त्यांच्या जागी  नवे १५ अधिकारी मिळाले आहेत. 

पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना येथे तर हेमंत कदम धाराशिवला बदलून गेले आहेत.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस अधिकाऱ्यांच्या ३१ जानेवारीपर्यंत बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात निवडणूक आयोगाने ठरवून दिल्यानुसार ज्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला आहे आणि जे जिल्ह्यातील रहिवासी आहेत, अशांचा समावेश होता.  परंतु, या बदल्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर नव्याने यादी मागविली होती. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांना अहवाल दिला होता. 

दोन पीआय, दोन एपीआय बदलले

बीडमधील पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना येथे तर हेमंत कदम यांची धाराशिवला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन पीआय अद्याप आले नाहीत, ते दोघेही नियंत्रण कक्षात होते. तसेच सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब व नारायण गित्ते यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या जागी त्याच जिल्ह्यातून विलास मोरे व संदीप पाटील हे बीडला आले आहेत.

हे पीएसआय बीडला आले, हे गेले

पोलिस उपनिरीक्षक राणी सानप, भास्कर शंकर कांबळे, तुकाराम रघुनाथ बोडखे, शिवशंकर बळीराम चोपणे, देविदास बाजीराव आवारे यांची धाराशिव जिल्ह्यात बदली झाली आहे. तर ज्ञानेश्वर दत्तात्रय राडकर, चेतन वसंतराव ओगले, भागवतराव विश्वजित फरतडे, उत्तम संभाजी नागरगोजे यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये बदली झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधून देवीदास बाबूअप्पा खांडकुळे, योगेश गोविंद पवार, स्वाती नाना लहाणे, प्रभाकर आसाराम मुंजाळ, संजय मुरलीधर धुमाळ हे बीडला आले आहेत. तर धाराशिववरून बसवेश्वर रामचंद्र चेनशेट्टी, रमाकांत मोहनराव शिंदे, भागवत यशवंत गाडे, सुकुमार गणपत बनसोडे, अनघा अंकुश गोडगे, शिवाजी रणबाग सर्जे, रियाज करिमखान पटेल, पल्लवी संजय पवार बीडला आले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस