शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठ्यासाठी १२० टॅँकर सज्ज, उद्भव मात्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:35 IST

आष्टी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले, तलाव आटले असून, पाण्याची समस्या भेडसावत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी वणवण : तालुक्यात पर्यायी उद्भव देण्याची मागणी

कडा : आष्टी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले, तलाव आटले असून, पाण्याची समस्या भेडसावत आहे.तालुकावासियांची मदार सध्या टँकरवर असली तरी पाण्याचे उद्भव आटले असून, पाणीपुरवठा करताना प्रशासनासमोर संकट ओढवले आहे. सध्या १२० टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी उद्भव नसल्याने जनतेवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने त्वरित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.सध्या मेहकरी, नागतळा, सीना याच तलावात थोड्या फार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तर दादेगाव, उंदरखेल, वेलतुरी हे दिलेले उदभव पूर्णपणे आटले आहेत. प्रशासनाने टँकर जरी दिले असले तरी उद्भव नसल्याने अनेक गावांतील लोकांना पाणी मिळत नसल्याने महिला व शाळकरी मुलीना परीक्षा काळात देखील पाण्यासाठी शिवार पालथे घालण्याची वेळ आली आहे. जर उद्भवात पाणीच नाही तर प्रशासनाने उद्भव देऊन जनतेची चेष्टा केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी होणारे हाल थांबवण्यासाठी तत्काळ पर्यायी उद्भव द्यावेत, अशी मागणी होत आहे.केवळ तीन उद्भवातच पाणीसाठा शिल्लकआष्टी पंचायत समितीने दुष्काळी परिस्थितीत जनतेची पाण्याविना हाल होऊ नयेत यासाठी सहा उद्भव दिले असले तरी दादेगाव, वेलतुरी, उंदरखेल ही जलस्रोत कोरडेठाक असून, फक्त नागतळा, सिना आणि मेहकरी या तीनच उद्भवात पाणीसाठा शिल्लक आहे. पर्यायी उद्भव मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली असल्याची माहिती बीडीओ आप्पासाहेब सरगर यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूक