शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १२ कोटी जमा; बँकेच्या चुकीमुळे औटघटकेचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 06:57 IST

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे.

शिरीष शिंदेबीड : जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने प्राधिकृत केलेल्या बँकेकडून १२ कोटी चुकून जमा झाले. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार जमा झाल्याने त्यांना मोठा आनंद झाला असेल; मात्र हा आनंद औटघटकेचा ठरणार आहे.

सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा कंपनीने तसे पत्र पाठवले आहे. विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल १२ कोटी रुपये चुकून जमा झाले आहेत. आता ही रक्कम परत घेण्यासाठी  विमा कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. 

कसे वसूल करणार?

ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाले असतील, त्या खात्याला १० हजार रुपये गोठवले अर्थात होल्ड केले जाणार आहेत. त्यामुळे रक्कम काढता येत नाही. 

पैसे परत दिले नाहीत तर काय होईल?

शेतकऱ्यांनी हे पैसे परत दिले नाही तर त्यांचे बँक खाते एनपीए जाते, सिबिल स्कोअर कमी होतो. परिणामी शेतकऱ्यास भविष्यात कर्ज घेता येत नाही. ९० दिवसांच्या आत रक्कम परत केली नाही तर त्या पैशांवर व्याज लागू शकते, तसेच कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. या संदर्भात कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अजिंक्य खिर्डीकर व जिल्हा व्यवस्थापक तौसिफ कुरेशी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड