शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

केस गळती आणि पिंपल्सच्या समस्या खाण्याच्या पानांमुळे होतील दूर, असा करा वापर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 11:31 IST

बदलत्या वातावरणात आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्याला स्वःतकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही.

बदलत्या वातावरणात आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्याला स्वःतकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. आता हिवाळा सुरू झाला असल्यामुळे त्वचा कोरडी पडायला सुरूवात होत आहे. तसंच केस सुध्दा भरपूर प्रमाणात गळतात. या सगळ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादनं वापरायला सुरूवात करतो. त्यात कोल्ड क्रिम पासून, बॉडी लोशन यांसारख्या उत्पादनांचा समावेश असतो. पण एव्हढं सगळं वापरून सुध्दा मनासारखी त्वचा आपल्याला मिळत नाही. कारण दररोज कामासाठी बाहेर पडत असताना तसच ऑफिसला  जात असताना प्रत्येकाला आकर्षक दिसावसं वाटतं असतं. जर तुम्हाला सुध्दा असं वाटत असेल. सहज उपलब्ध होत असलेल्या खाणाच्या पानांचा वापर  अनेक प्रकारे करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता.

केस गळणं थांबतं

जर तुमचे केस गळत असतील तर खाण्याच्या पानांचा वापर करून तुम्ही केस गळणं थांबवू शकता. त्यासाठी खाण्याची पानं आधी धुवून घ्या. त्यानंतरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर या पानांना तिळाच्या किंवा नारळाच्या तेलात मिक्स करून केसांच्या मुळांना लावा. एक तास राहू द्या त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातुन दोनवेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. 

पिंपल्स दूर होतात. 

खाण्याच्या पानात अ‍ॅन्टी बॅक्टिरीयल गुण असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग, तसंच मुरुमं निघून जाण्यास मदत होते. यासाठी खाण्याची पानं पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पानं दळून घ्या. दळून झाल्यानंतर त्याच हळद घाला आणि त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. दिवसातून दोनवेळा हा प्रयोग केल्यास पिंपल्सची समस्या दूर होईल. 

शरीराची दुर्गंधी दुर करते.

दिवसभर घराबाहेर असाल किंवा प्रवास करत असाल तर खूप घाम येतो. अशावेळी अंगाला येणाऱ्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात या पानांचं तेल घातल्यास ही समस्या उद्भवणार नाही. 

खाजेपासुन आराम मिळतो.

हिवाळ्यात त्वचेवर खूप खाज येते. खाजेपासून सुटका करण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. यासाठी पाण्यात ९ ते १० पानं घालून उकळून घ्या. मग ते पाणी अंघोळीसाठी वापरा. असे केल्यास त्वचेची खाजेपासून सुटका होईल. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स