शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

केस गळती आणि पिंपल्सच्या समस्या खाण्याच्या पानांमुळे होतील दूर, असा करा वापर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 11:31 IST

बदलत्या वातावरणात आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्याला स्वःतकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही.

बदलत्या वातावरणात आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्याला स्वःतकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. आता हिवाळा सुरू झाला असल्यामुळे त्वचा कोरडी पडायला सुरूवात होत आहे. तसंच केस सुध्दा भरपूर प्रमाणात गळतात. या सगळ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादनं वापरायला सुरूवात करतो. त्यात कोल्ड क्रिम पासून, बॉडी लोशन यांसारख्या उत्पादनांचा समावेश असतो. पण एव्हढं सगळं वापरून सुध्दा मनासारखी त्वचा आपल्याला मिळत नाही. कारण दररोज कामासाठी बाहेर पडत असताना तसच ऑफिसला  जात असताना प्रत्येकाला आकर्षक दिसावसं वाटतं असतं. जर तुम्हाला सुध्दा असं वाटत असेल. सहज उपलब्ध होत असलेल्या खाणाच्या पानांचा वापर  अनेक प्रकारे करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता.

केस गळणं थांबतं

जर तुमचे केस गळत असतील तर खाण्याच्या पानांचा वापर करून तुम्ही केस गळणं थांबवू शकता. त्यासाठी खाण्याची पानं आधी धुवून घ्या. त्यानंतरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर या पानांना तिळाच्या किंवा नारळाच्या तेलात मिक्स करून केसांच्या मुळांना लावा. एक तास राहू द्या त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातुन दोनवेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. 

पिंपल्स दूर होतात. 

खाण्याच्या पानात अ‍ॅन्टी बॅक्टिरीयल गुण असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग, तसंच मुरुमं निघून जाण्यास मदत होते. यासाठी खाण्याची पानं पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर पानं दळून घ्या. दळून झाल्यानंतर त्याच हळद घाला आणि त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. दिवसातून दोनवेळा हा प्रयोग केल्यास पिंपल्सची समस्या दूर होईल. 

शरीराची दुर्गंधी दुर करते.

दिवसभर घराबाहेर असाल किंवा प्रवास करत असाल तर खूप घाम येतो. अशावेळी अंगाला येणाऱ्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात या पानांचं तेल घातल्यास ही समस्या उद्भवणार नाही. 

खाजेपासुन आराम मिळतो.

हिवाळ्यात त्वचेवर खूप खाज येते. खाजेपासून सुटका करण्यासाठी खाण्याची पानं फायदेशीर ठरतात. यासाठी पाण्यात ९ ते १० पानं घालून उकळून घ्या. मग ते पाणी अंघोळीसाठी वापरा. असे केल्यास त्वचेची खाजेपासून सुटका होईल. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स