शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

केवळ अपुरी झोप नाही तर 'ही' आहेत डोळ्याखाली काळे डाग येण्याची कारणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 11:24 IST

Dark Circles Removal Tips : डार्क सर्कलचा विषय निघाला की, सहजपणे कुणीही झोप झाली नसेल किंवा पूर्ण झोप घेत जा असा सल्ला देतात.

डार्क सर्कलचा विषय निघाला की, सहजपणे कुणीही झोप झाली नसेल किंवा पूर्ण झोप घेत जा असा सल्ला देतात. म्हणजे काय तर डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याचं मुख्य कारण हे पुरेशी झोप न घेणे हेच अनेकजण समजतात. अनेकदा डोळ्याखालच्या त्वचेचा रंग हा डार्क होतो. पण याला केवळ झोप न घेणे हेच कारण नाही. अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही डार्क सर्कल्स येतात. चला जाणून घेऊ डार्क सर्कलची कारणे....

व्हिटॅमिन ए ची कमतरता

व्हिटॅमिन ए त्वचेसाठी अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखं काम करतं. त्यामुळे या व्हिटॅमिनचा नियमित आहारात समावेश करायला हवा. कारण व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डार्क सर्कलची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेचं तारूण्य वाढतं आणि ब्लड सर्कुलेशनही योग्य प्रकारे होतं. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात.  त्यामुळे डाएटमध्ये गाजर, कलिंगड, पपई यांसारख्या फळांचा समावेश करावा.

व्हिटॅमिन सी ची कमतरता

अनेकदा या फायदेशीर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी हेल्दी आणि त्वचेला निरोगी ठेवण्याचं महत्वाचं व्हिटॅमिन आहे. याच्या सेवनाने नसा मजबूत होतात. तसेच त्वचा लवचिक होतो आणि डोळ्यांखालील त्वचेवर आलेली सूजही दूर  होते.

त्यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर करायची असेल तर वेगवेगळ्या फळांसोबतच हिरव्या पालेभाज्यांचंही सेवन करावं. त्यात संत्री, लिंबू, फ्लॉवर, ब्रोकली यांचा समावेश करावा. यातून तुम्हाला भरपूरप प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल.

काय आहे उपाय?

रोज कमीत कमी ८ तासांची झोप

दिवसा घराबाहेर पडताना सन ग्लासेस वापरणे

जर डोळ्यांच्या आजूबाजूला काळे डाग असतील तर कच्च्या बटाट्याची किंवा काकडीची पेस्ट लावा

चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा

व्हिटॅमिन सी, के आणि व्हिटॅमिन इ असलेले क्रीम यासाठी वापरु शकता.

पोषक आहार

आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे तरुण असतानाच डोळ्यांच्या चारही बाजूने बारीक रेषा दिसू लागतात. हसताना किंवा जांभई देताना त्वचेवर ताण पडतो. क्रॅश डायटिंग याचं प्रमुख कारण आहे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर याने त्वचा आकुंचन पावतात आणि सुरकुत्या वाढतात. त्यामुळे पोषक आहार घेणे यासाठी फार महत्वाचे आहे. 

अशात दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. ताजी फळे, ज्यूस, ताक, लिंबू पाणी आणि लस्सीचे सेवन करावे. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. क्रॅश डायटिंग टाळा कारण याने वजन कमी झाल्यावर त्वचा सैल पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय