शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मिठाच्या पाण्यात रोज पाय ठेवून बसल्याने काय होतं? फायदे इतके ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 14:44 IST

Himalayan salt water : हलक्या गुलाबी रंगाच्या या मिठामध्ये अनेक पौषक तत्व असतात. अशात या मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Himalayan salt water : सैंधव मिठाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. उपवास किंवा उत्सवांदरम्यान या मिठाचा अधिक वापर केला जातो. कारण हे मीठ पांढऱ्या मिठाच्या तुलनेत अधिक पवित्र मानलं जातं. आजकाल सैंधव मीठ हे आपल्या गुणांमुळे नेहमीच चर्चेत असतं. महत्वाची बाब म्हणजे अनेक गंभीर आजारांवर हे मीठ रामबाण उपाय ठरतं. सैंधव मिठाला हिमालयन सॉल्ट असंही म्हटलं जातं. हलक्या गुलाबी रंगाच्या या मिठामध्ये अनेक पौषक तत्व असतात. अशात या मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हिमालयन सॉल्ट कुठून येतं?

भारतात हिमालयन सॉल्ट सामान्यपणे पाकिस्तानातून येतं. भारतात फार पूर्वीपासून याचा वापर केला जातो. हे मीठ पाकिस्तानातील खेवडा नावाच्या खाणीतून येतं. यात पोटॅशिअम ते मॅग्नेशिअम अशा अनेक खनिजांचा भांडार असतो. याच कारणाने या मिठाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या मिठाच्या मदतीने अनेक गंभीर आजार, वेदना आणि तणाव दूर करण्यास मदत मिळते. जर तुम्हालाही या मिठापासून फायदा मिळवायचा असेल तर या मिठाच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवून बसा. 

ब्लड प्रेशर होईल कंट्रोल

हिमालयन सॉल्टमधील मिनरल्स मांसपेशींमधील आखडलेपणा दूर करतात आणि ब्लड सर्कुलेशन योग्यपणे करतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. आहारात याचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होतं, ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

तणाव दूर होतो

जर तुम्हाला तणावाची समस्या असेल आणि तो संतुलित ठेवायचा असेल तर सैंधव मिठाचं तुम्ही सेवन करू शकता. यात असलेल्या मेलाटोनिन आणि सेराटोनिनने हार्मोन्स कंट्रोल होतात. यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत मिळते.

त्वचा चांगली राहते

जर तुम्हाला त्वचेचं आरोग्य आणखी चांगलं ठेवायचं असेल तर या मिठाच्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवून बसा. यासाठी अर्धा बकेट पाणी आधी गरम करा आणि त्यात एक चमचा सैंधव मीठ टाका. यात पाय ठेवून बसा. याने पायांची डेड स्कीन आणि पायांच्या भेगा, ड्राय स्कीन दूर होईल. पाय मुलायम आणि चमकदार होतील.

वेदना होईल दूर

जर तुम्हाला पायांच्या जॉईंट्समध्ये वेदना होत असेल, गुडघे दुखत असतील तर सैंधव मिठाच्या पाण्यात पाय ठेवून काही वेळ बसा. याने तुम्हाला या समस्या दूर करण्यास मदत मिळेल. 

हाडे होतील मजबूत

सैंधव मिठामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत मिळते. यात मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात. अशात या मिठाच्या पाण्यात काही वेळ पाय ठेवून बसल्याने तुम्हाला हाडांचं दुखणं दूर करण्यास मदत मिळेल. तसेच पायांवरील सूजही कमी होईल.

झोप न येण्याची समस्या होईल दूर

आजकाल अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी झोप न येण्याची समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. या मिठाच्या पाण्यात अर्धा तास पाय ठेवून बसल्यावर तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होईल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स