शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

'ही' तीन फळं चेहऱ्यावर येऊ देत नाही सुरकुत्या, तुम्ही कधीच नाही म्हातारे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 10:46 IST

फळं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. एक्सपर्ट सांगतात की, एका दिवसात दोन फळं खाल्लीत तर अ‍ॅंटी-एजिंग समस्या दूर होते.

फळं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. एक्सपर्ट सांगतात की, एका दिवसात दोन फळं खाल्लीत तर अ‍ॅंटी-एजिंग समस्या दूर होते. फळांमधील अनेक पोषक तत्व वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसोबत लढण्यासही मदत करतात. फळांमधील नॅच्युरल शुगर शरीरासाठी आवश्यक ऊर्जेची कमतरता भरून काढते. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असल्याने अनेक प्रकारच्या संक्रमणापासूनही तुमचा बचाव होतो. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये असे वाटत असेल तर महागडे क्रीम वापरण्याऐवजी काही फळं नियमित खावीत. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तीन खास फळं फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ कोणती आहेत ही फळे...

सफरचंद 

(Image Credit : express.co.uk)

सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत. तसेच रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतं. सफरचंद सालीसोबतच खाणं अधिक फायदेशीर असतं. अनेकजण साल काढून टाकतात, जे चुकीचं आहे. कारण या सालीमध्ये अ‍ॅंटी-एजिंग तत्व असतात. तसेच याने आतड्यांमध्ये गुड एंजाइम्स वाढतात, ज्याने तुमच्या शरीरात पाणी नियंत्रित राहतं.

पपई

पपईमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. याचं सेवन केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते. सुरकुत्याही दूर होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि त्वचेसाठी सर्वात फायदेशीर व्हिटॅमिन ई भरपूर असतात. त्यासोबतच कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम इत्यादीही आढळतात. पपईमध्ये असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यासही मदत करतात. याने वाढलेल्या वयाची लक्षणे त्वचेवर दिसत नाही.

एवोकाडो

एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, बी आणि ए भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन ए चं प्रमाण अधिक असतं. याने त्वचेवरील मृत पेशी नष्ट करण्यास आणि नवीन पेशीचं निर्माण करण्यास मदत मिळते. यातील कॅरोटेनॉइडमुळे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या टॅनिंगपासूनही बचाव होतो.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स