शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 10:40 IST

काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात.

आता जवळपास सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. थंडीच्या दिवसात काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीची टाळाटाळ करतात. या दिवसात सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या होणे. काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात. पण थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे होतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

त्वचेची स्वच्छता - मिठामध्ये मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे मिनरल्स त्वचेच्या रोमछिद्रांपर्यंत जातात आणि त्वचेची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात. तसेच त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

स्ट्रेस होतो दूर - कोमट पाण्यामध्ये मिठ टाकून आंघोळ केल्यास त्या व्यक्तीचा स्ट्रेस दूर होण्यास मदत होते. जास्त थकवा आणि स्ट्रेस असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायला हवी. 

त्वचेवर येतो ग्लो - थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक वाटत असेल तरी याने त्वचेला नुकसान होतं. त्यामुळे कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग आणि सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते. 

सांधेदुखीपासून आराम - थंडीच्या दिवसात अनेकांना सांधेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सहन करावी लागते. अशावेळी या लोकांनी कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी.

त्वेचेच्या मृत पेशी होतील दूर - थंडीच्या दिवसात मृत त्वचेची समस्या ही सामान्य बाब आहे. ही मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स