शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 10:40 IST

काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात.

आता जवळपास सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. थंडीच्या दिवसात काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीची टाळाटाळ करतात. या दिवसात सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या होणे. काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात. पण थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे होतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

त्वचेची स्वच्छता - मिठामध्ये मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे मिनरल्स त्वचेच्या रोमछिद्रांपर्यंत जातात आणि त्वचेची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात. तसेच त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

स्ट्रेस होतो दूर - कोमट पाण्यामध्ये मिठ टाकून आंघोळ केल्यास त्या व्यक्तीचा स्ट्रेस दूर होण्यास मदत होते. जास्त थकवा आणि स्ट्रेस असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायला हवी. 

त्वचेवर येतो ग्लो - थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक वाटत असेल तरी याने त्वचेला नुकसान होतं. त्यामुळे कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग आणि सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते. 

सांधेदुखीपासून आराम - थंडीच्या दिवसात अनेकांना सांधेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सहन करावी लागते. अशावेळी या लोकांनी कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी.

त्वेचेच्या मृत पेशी होतील दूर - थंडीच्या दिवसात मृत त्वचेची समस्या ही सामान्य बाब आहे. ही मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स