शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोणते गुण जिंकवतात पी. व्ही. सिंधूला? , सिंधूचे ओकुहाराविरुद्धचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:47 IST

सध्याचा काळ हा भारतीय बॅडमिंटनचा आणि क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. सानिया, सायना, साक्षी, मिताली राज व सहकारी आणि पी. व्ही. सिंधू यशाचे नवनवे शिखर सर करीत आहेत. सिंधूचे कोरियन ओपनचे विजेतेपद ही या यशात पडलेली ताजी भर आहे.

ललित झांबरे ।जळगाव : सध्याचा काळ हा भारतीय बॅडमिंटनचा आणि क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. सानिया, सायना, साक्षी, मिताली राज व सहकारी आणि पी. व्ही. सिंधू यशाचे नवनवे शिखर सर करीत आहेत. सिंधूचे कोरियन ओपनचे विजेतेपद ही या यशात पडलेली ताजी भर आहे. यासोबतच आॅलिम्पिक रौप्यविजेती पहिली, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन पदकं जिंकणारी पहिली, आॅलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय या सिंधूच्या बिरुदांमध्ये कोरियन ओपन जिंकणारी पहिली या ताज्या बिरुदाची भर पडली आहे.सिंधूच्या या ताज्या यशाची दोन वैशिष्ट्ये दिसतात. पहिले म्हणजे तिने सकारात्मक विचार करून केलेला खेळ आणि दुसरे म्हणजे चुका सुधारण्याची तिची तयारी. यामुळेच जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून जागतिक स्पर्धेतल्या पराभवाचे ती ऊट्टे काढू शकली. ग्लासगोला जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोझोमी ओकुहाराकडून सिंधू १९-२१, २२-२०, २०-२२ अशी हरली. त्यानंतर महिनाभरातच बाजी पलटवत तिने सोल इथे ओकुहारावर २२-२०, ११-२१, २१-१८ असा विजय मिळवला.स्कोअर बघा... फारसा फरक नाही. वेळ बघा... ग्लासगोला ११० मिनिटे आणि सोल इथे ८३ मिनिटे. संघर्षाचा वेळ घटला आणि निकालही बदलला. हे कसे झाले? वास्तविक सिंधूचे वडील रामन्ना यांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्पर्धेतल्या पराभवानंतर ती नाराज होती; पण या नाराजीचा परिणाम तिने खेळावर होऊ दिला नाही.कोरियन विजेतेपदानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सिंधूने काय म्हटलेय... ती म्हणते, ‘सोलला पुन्हा त्याच ओकुहाराविरुद्ध अंतिम सामना खेळताना महिनाभरापूर्वीचा जागतिक अजिंक्यपद अंतिम सामन्यातला आघाडीनंतरचा पराभव आपल्या मनातही नव्हता. त्याचा अजिबात विचार न करता मी पुढचा प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे हे स्वत:ला सांगत होते. दुसरा कोणताही विचार न करता शटलवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे होते.’ याला म्हणतात सकारात्मक विचार. अशा विचारांनीच तिला दडपण न घेता खेळ करू दिला.सिंधूच्या सकारात्मक विचारसरणीचे आणखी एक उदाहरण पहा..! ती म्हणते की सामना ओकुहाराशी असो की आणखी कुणाशी... त्याने फरक पडत नसतो. महत्त्वाचे असते ते फक्त समोरच्याला हरवून जिंकणे. त्यामुळे अंतिम लढत कुणाशी आहे याच्याने फारसा फरक पडत नाही. सिंधूच्या यशातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिची चुका सुधारण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी. तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणतात, की ग्लासगोतल्या पराभवानंतर आम्हाला तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही; पण मिळाला त्या वेळेत आम्ही सिंधूच्या खेळात आक्रमकता आणण्यावर आणि ग्लासगोत ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यावर भर दिला.गोपीचंद यांच्याप्रमाणेच सिंधूला तिचे वडील, व्हॉलिबॉलपटू रामन्ना हेसुद्धा टीप देत असतात. त्यांनी निरीक्षणातून हेरलेली ओकुहाराची खेळाची शैली आणि त्यानुसार आखलेले डावपेच सिंधूला विजयी बनवणारे ठरले. जागतिक स्पर्धेवेळी रामन्ना यांनी पाहिले की, सिंधूच्या बॅकहँडवर डाऊन द लाईन ओकुहारा अधिक मारा करत होती आणि त्यानंतर चपळाईने नेटजवळ येत सिंधूला अडचणीत आणत होती. त्यामुळे ओकुहाराच्या या चाली निष्प्रभ ठरवण्यासाठी रामन्ना यांनी सिंधूला सल्ला दिला, की काही वेळा शटल बॅकहँडकडे ठेव, जेणेकरून ओकुहारा गोंधळात पडेल की आता परतीचा फटका पुढ्यात टाकायचा की बॅकहँडला द्यायचा. सिंधूने असेच केले आणि हे डावपेच यशस्वी ठरले असे रामन्ना म्हणतात.रामन्ना यांनीच दिलेल्या माहितीनुसार, सिंधूला खेळताना मजा येते. ती खेळाचा आनंद घेते आणि म्हणूनच सरावात ती कधी थकत नाही की कंटाळत नाही. आनंद घेत खेळणे हेच त्यांच्या मते तिच्या यशाचे गमक आहे.>२०१२युवा आशियाई स्पर्धा१८-२१, २१-१७, २२-२०२०१७सिंगापूर ओपन१०-२१, २१-१५,२२-२०२०१४ हाँगकाँग ओपन१७-२१, २१-१३, ११-२१२०१५ मलेशिया मास्टर्स२१-१९, १३-२१, ८-२१२०१६ आशियाई स्पर्धा २१-१८, १२-२१, १२-२१२०१७ जागतिक स्पर्धा १९-२१, २२-२०, २०-२२२०१६रिओ आॅलिम्पिक२१-१९, २१-१०२०१७कोरियन ओपन२२-२०, ११-२१, २१-१८