शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

समोर सायना असल्यामुळे अंतिम फेरीचा सामना सोपा नव्हता - पी.व्ही.सिंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 18:30 IST

बॅडमिंटनमध्ये रँकिंग अव्वल आहे म्हणून तुम्ही तो सामना सहज जिंकाल असा विचार करुन चालत नाही.

ठळक मुद्देअंतिम फेरीत पोहोचल्यानंतर समोर सायना नेहवाल असल्यामुळे हा सामना माझ्यासाठी सोपा नसणार याची कल्पना होती. टॉप 20 मध्ये असलेल्या बॅडमिंटनपटूंमध्ये थोडाबहुत फरक असला तरी क्षमता एकसमानच आहे.

नवी दिल्ली - बॅडमिंटनमध्ये रँकिंग अव्वल आहे म्हणून तुम्ही तो सामना सहज जिंकाल असा विचार करुन चालत नाही. जिंकण्यासाठी तुम्हाला सामन्यावर लक्ष केंद्रीत करावे लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे अतिआत्मविश्वास बाळगू नये असे मत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू आणि जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या पी.व्ही.सिंधूने व्यक्त केले. 82 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फुलराणी सायना नेहवालने अंतिम फेरीत सिंधूवर मात केली. 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिंधू म्हणाली की, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यंदा सर्व टॉप खेळाडू सहभागी होणार होते. ही महत्वाची स्पर्धा होती. मी माझा नैसर्गिक खेळ केला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर समोर सायना नेहवाल असल्यामुळे हा सामना माझ्यासाठी सोपा नसणार याची कल्पना होती. चांगला सामना झाला. मला जिंकायला आवडले असते पण शेवटी जय-पराजय खेळाचा एक भाग आहे असे सिंधू म्हणाली. 

महिला बॅडमिंटन आता भरपूर स्पर्धात्मक बनले आहे. टॉप 20 मध्ये असलेल्या बॅडमिंटनपटूंमध्ये थोडाबहुत फरक असला तरी क्षमता एकसमानच आहे. दोन खेळाडू एकसारखे असू शकत नाही. प्रत्येकाची खेळण्याची शैली, फटक्यांची क्षमता यामध्ये फरक असतो. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे डावपेच लागू पडतात असे सिंधूने सांगितले. 

ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर अपेक्षांचे ओझे वाढले असे तुला वाटले का ? या प्रश्नावर सिंधू म्हणाली कि, आपल्या सर्वांच्या आयुष्यात लक्ष्य असते. लक्ष्य निश्चित केल्यानंतर ते गाठणे सोपे नसते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मला कधीच अपेक्षांचे ओझे जाणवले नाही. मी भरपूर काही मिळवले आहे. पण माझ्यासाठी ही एक सुरुवात आहे. अजून भरपूर काही मिळवायचे आहे असे सिंधूने सांगितले. 

सायनाने मिळवला विजयसहा हजारांवर प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत बुधवारी कोराडी मार्गावरील मानकापूर संकुलात खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात २८ वर्षीय सायनाने २१ वर्षीय सिंधूला ५३ मिनिटांत २१-१७, २७-२५ ने पराभूत करीत २००७ नंतर तिसरे राष्ट्रीय विजेतेपद संपादन केले.

सायना- सिंधू सामन्याबद्दल प्रचंड उत्कंठा होती. उभय खेळाडूंनी रोमहर्षक खेळ करीत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दोघीही प्रत्येक गुणासाठी अक्षरश: झुंजल्या. सायनाने आक्रमक सुरुवात करीत चुका टाळल्या. त्याचा लाभ तिला पहिला गेम २१-१७ असा जिंकण्यात झाला.

दुस-या गेममध्ये मात्र सिंधूने सकारात्मक सुरुवात करीत प्रारंभी ५-१ अशी आघाडी मिळविली. पण सायनाने पिछाडी भरून काढून ६-६ अशी बरोबरी साधली. सिंधू जेव्हा १८-१४ अशी विजयाकडे वाटचाल करीत होती तोच सायनाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सलग चार गुणांसह पुन्हा एकदा १८-१८ अशी बरोबरी केली. यानंतर गुणांचा थरार सुरू झाला. सायना पाच वेळा गेम आणि सामना जिंकण्याच्या स्थितीत आली असताना सिंधूने मुसंडी मारून संघर्ष केला. अखेर लढत २६-२५ अशी काठावर आली तोच सायनाने मारलेला शॉट सिंधूकडून परत न येता नेटमध्ये अडकताच सायनाचा सनसनाटी विजय साकार झाला.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू