शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

व्यस्त वेळापत्रकावर भडकली सायना, बीडब्ल्यूएफला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:53 IST

विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे.

नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय  सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे.बीडब्ल्यूएफने २०१८ च्या नव्या वेळापत्रकात आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना वर्षभरात किमान १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य केले आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगचे (पीबीएल) उद्घाटन झाल्यानंतर सायना म्हणाली, ‘बीडब्ल्यूएफचा पुढील वर्षाचा कार्यक्रम अतिशय व्यस्त आहे. अव्वल खेळाडूंसाठी हे योग्य नाही. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दोन स्पर्धांमध्ये पुरेसे अंतर असायला हवे. मी सलगपणे स्पर्धा खेळू शकत नाही. स्पर्धेत सहभागी होऊ शकते, पण जिंकू शकणार नाही.’पीबीएलनंतर ३ स्पर्धा आहेत. विश्व चॅम्पियनशिपआधी ३ सुपर सीरिजचे आयोजन होणार आहे. हे पाहता बीडब्ल्यूएफने इतके व्यस्त वेळापत्रक का आखले, हेच आकलनापलीकडचे आहे. खेळाडूंसाठी हे थकविणारे आणि आव्हानात्मक असल्याचे सायनाचे मत आहे.पीबीएलच्या तिसºया पर्वात अवध वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणारी सायना पुढे म्हणाली, ‘मी सर्वच स्पर्धा खेळणार की नाही, याची शाश्वती नाही. माझे प्राधान्य फिटनेसला आहे, स्पर्धा जिंकण्याला नाही.खेळाडूंकडून पुढच्या सत्रात राष्टÑीय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची अपेक्षा बाळगणे योग्य आहे काय, असे विचारताच सायना म्हणाली,‘पुढच्या सत्रातील व्यस्त वेळापत्रक बघता राष्टÑीय चॅम्पियनशिप कुठेच बसत नाही. तीन दिवसांचीस्पर्धा झाल्यास माझ्या मते, कुणालाही फरक जाणवणार नाही. राष्टÑकुल, आशियाड आणि विश्व चॅम्पियनशिपच्या आयोजनामुळे प्रत्येक स्पर्धेदरम्यान दोन आठवड्यांत स्वत:ला सज्ज करण्याचे आव्हान असेल. खेळाडू जखमी झाला असेल तर त्याला जखमेतून सावरण्यास वेळ नाहीच, असे सायनाचे मत आहे.आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिनेदेखील सायनाच्या मताशी सहमती दर्शविली. मारिन म्हणाली, ‘पुढील सत्रातील व्यस्त वेळापत्रक थकविणारे आहे. पुढच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये लागू होणारे नवे नियम ‘मूर्ख बनविणारे’ असल्याचा उल्लेख केला. (वृत्तसंस्था)बीडब्ल्यूएफने गटातील एकेरीतील अव्वल१५ खेळाडूंना आणि दुहेरीच्या अव्वल १० जोड्यांना वर्षांत १२ स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य केले आहे. असे न केल्यासत्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.पीबीएलच्या तिसºया सत्रात ८ संघांत ८० खेळाडू आहेत. त्यात विश्व चॅम्पियनशिपमधील आठ पदक विजेते आणि नऊ आॅलिम्पिक पदकविजेते सहभागी होतील. दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद आणि चेन्नई येथे सामने खेळले जातील.‘बीडब्ल्यूएफ बॅडमिंटनला टेनिससारखे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मग ग्रॅण्डस्लॅमसारख्या केवळ चार-पाच स्पर्धा व्हायला हव्यात. त्यामुळे अधिक आर्थिक नफा आणि प्रसिद्धी होईल. मी बीडब्ल्यूएफ प्रमुख असते तर निश्चितपणे हेच केले असते. अधिक रोख पारितोषिकांवर मी आनंदी आहे, पण इतक्या स्पर्धा होत असतीलतर खेळाडूंचे काही खरे नाही...’- सायना नेहवाल

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton