शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:04 IST

आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली.

हैदराबाद  - आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली.गोपीचंद या स्पर्धेत जेतेपद पटकाविणारे अखेरचे भारतीय खेळाडू होते. त्यांनी हा पराक्रम २००१ मध्ये केला होता.ते म्हणाले, यंदा मार्चमध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप व आॅगस्टमध्ये विश्व चॅम्पियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा होणार आहेत.सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या दोन्ही खेळाडूंची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. या दोन्ही खेळाडूआॅल इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करू शकतात, असे गोपीचंद यांना वाटते.ते म्हणाले, ‘यंदा कुणी भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेत जेतेपद पटकावेल, अशी मला आशा आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि कादाम्बी श्रीकांत चांगली कामगिरी करीत आहेत. यंदा आॅल इंग्लंडमध्ये आमची कामगिरी चांगली ठरेल, असे मला वाटते.’भारतीय प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘सायनाने अलीकडेच इंडोनेशिया ओपनमध्ये जेतेपद पटकाविले आहे आणि सिंधूची कामगिरीही चांगली होत आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात, असे मला वाटते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूने जेतेपद पटकाविण्यास १८ वर्षांचा कालावधी लोटला असून, यंदा पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास यश येईल, अशी आशा आहे.’गोपीचंद यांनी २००१ मध्ये जेतेपद पटकाविले होते. त्याआधी, प्रकाश पदुकोण यांनी १९८० मध्ये हा पराक्रम केला होता.श्रीकांतकडून चांगल्या कामगिरीची आशा असल्याचे गोपीचंद यांनी यावेळी सांगितले.देशात बॅडमिंटनची लोकप्रियता वाढत असून, खेळाडूंच्या संख्येत प्रशिक्षकांची संख्या मात्र वाढलेली नाही. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांनी व्यक्त केले. गोपीचंद म्हणाले, ‘देशात दर्जेदार प्रशिक्षकांची वानवा आहे. आमच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान प्रशिक्षकांची पुढची पिढी तयार करण्याचे आहे. अलीकडच्या कालावधीत विदेशी प्रशिक्षकांवर विसंबून राहण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे मायदेशात चांगले प्रशिक्षक तयार करणे गरजेचे आहे.’

टॅग्स :BadmintonBadminton