शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायनाची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:16 IST

पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.सायनाने सहज विजय मिळवताना डेन्मार्कच्या सोफी डहल हिला २१-१५, २१-९ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये थोडीफार चुरस पहायला मिळाल्यानंतर सायनाने दुसºया गेममध्ये एकतर्फी खेळ करताना सोफीला संधी दिली नाही. सायनाच्या वेगवान खेळापुढे तिचा काहीच निभाव लागला नाही. त्याचप्रमाणे, सिंधूनेही एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज विजय मिळवताना डेन्मार्कच्याच नतालिया कोच रोड हिचा २१-१०, २१-१३ असा धुव्वा उडवला. सिंधूने वेगवान स्मॅश आणि नेट्सजवळील अप्रतिम नियंत्रणाच्या जोरावर नतालियाला फारवेळ टिकू दिले नाही.पुरुषांच्या गटात मात्र जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या (बीडब्ल्यूएफ) नव्या नियमांचा परिणाम दिसू लागला आहे. नव्या नियमानुसार जागतिक क्रमवारीतील अव्वल १५ खेळाडूंना प्रमुख १५ स्पर्धांपैकी १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य असल्याने प्रणॉयला पायाला दुखापत असतानाही या स्पर्धेत खेळावे लागले. याचा फटका त्याला पहिल्याच फेरीत बसला. भारताच्याच श्रेयांश जयस्वालविरुद्ध खेळताना प्रणॉय सुरुवातीपासून झगडताना दिसला. खेळताना येत असलेल्या अडचणीमुळे अखेर प्रणॉयला पहिल्याच फेरीत ४-२१, ६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मलेशिया आणि इंडोनेशिया येथे झालेल्या पहिल्या दोन सुपर स्पर्धांमध्ये सहभागी न झाल्यानंतर इंडिया ओपनमध्ये खेळणे प्रणॉयसाठी अनिवार्य बनले होते.याविषयी प्रणॉय म्हणाला की, ‘कमीत कमी १२ स्पर्धा खेळण्याच्या ‘बीडब्ल्यूएफ’ नव्या नियमामुळे मला इंडिया ओपन स्पर्धा खेळावी लागली. शिवाय पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी माझ्याच देशाचा असल्याने मी सामन्यातून माघारही घेऊ शकत नव्हतो. कारण असे केले असते, तर नव्या नियमानुसार मला आणि माझ्या देशाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूलाही गुण मिळाला नसता.’ (वृत्तसंस्था)यामुळे केवळ स्पर्धा राहतील...नव्या नियमानुसार सध्याचे वेळापत्रक खेळाडूंसाठी खूप कठीण आहे. माझ्यामते यामध्ये स्पर्धांची संख्या कमी करण्यात आले पाहिजे. मी प्रायोजक आणि आर्थिक बाजू समजू शकते. पण यामुळे खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरला नाही पाहिजे. यामुळे आपल्याकडे केवळ स्पर्धा राहतील, पण चॅम्पियन मिळणार नाही. दीर्घ काळापर्यंत खेळण्यासाठी आम्हाला तंदुरुस्त रहावे लागेल आणि यंदाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. - सायना नेहवाल 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत