शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायनाची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:16 IST

पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.सायनाने सहज विजय मिळवताना डेन्मार्कच्या सोफी डहल हिला २१-१५, २१-९ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये थोडीफार चुरस पहायला मिळाल्यानंतर सायनाने दुसºया गेममध्ये एकतर्फी खेळ करताना सोफीला संधी दिली नाही. सायनाच्या वेगवान खेळापुढे तिचा काहीच निभाव लागला नाही. त्याचप्रमाणे, सिंधूनेही एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज विजय मिळवताना डेन्मार्कच्याच नतालिया कोच रोड हिचा २१-१०, २१-१३ असा धुव्वा उडवला. सिंधूने वेगवान स्मॅश आणि नेट्सजवळील अप्रतिम नियंत्रणाच्या जोरावर नतालियाला फारवेळ टिकू दिले नाही.पुरुषांच्या गटात मात्र जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या (बीडब्ल्यूएफ) नव्या नियमांचा परिणाम दिसू लागला आहे. नव्या नियमानुसार जागतिक क्रमवारीतील अव्वल १५ खेळाडूंना प्रमुख १५ स्पर्धांपैकी १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य असल्याने प्रणॉयला पायाला दुखापत असतानाही या स्पर्धेत खेळावे लागले. याचा फटका त्याला पहिल्याच फेरीत बसला. भारताच्याच श्रेयांश जयस्वालविरुद्ध खेळताना प्रणॉय सुरुवातीपासून झगडताना दिसला. खेळताना येत असलेल्या अडचणीमुळे अखेर प्रणॉयला पहिल्याच फेरीत ४-२१, ६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मलेशिया आणि इंडोनेशिया येथे झालेल्या पहिल्या दोन सुपर स्पर्धांमध्ये सहभागी न झाल्यानंतर इंडिया ओपनमध्ये खेळणे प्रणॉयसाठी अनिवार्य बनले होते.याविषयी प्रणॉय म्हणाला की, ‘कमीत कमी १२ स्पर्धा खेळण्याच्या ‘बीडब्ल्यूएफ’ नव्या नियमामुळे मला इंडिया ओपन स्पर्धा खेळावी लागली. शिवाय पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी माझ्याच देशाचा असल्याने मी सामन्यातून माघारही घेऊ शकत नव्हतो. कारण असे केले असते, तर नव्या नियमानुसार मला आणि माझ्या देशाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूलाही गुण मिळाला नसता.’ (वृत्तसंस्था)यामुळे केवळ स्पर्धा राहतील...नव्या नियमानुसार सध्याचे वेळापत्रक खेळाडूंसाठी खूप कठीण आहे. माझ्यामते यामध्ये स्पर्धांची संख्या कमी करण्यात आले पाहिजे. मी प्रायोजक आणि आर्थिक बाजू समजू शकते. पण यामुळे खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयशी ठरला नाही पाहिजे. यामुळे आपल्याकडे केवळ स्पर्धा राहतील, पण चॅम्पियन मिळणार नाही. दीर्घ काळापर्यंत खेळण्यासाठी आम्हाला तंदुरुस्त रहावे लागेल आणि यंदाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. - सायना नेहवाल 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत