शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदीकेअर’साठी विदेशी विमा कंपन्या नकोत! स्वदेशी जागरण मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:50 IST

अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे.संस्थेचे सह-समन्वयक अश्वनी महाजन यांनी सांगितले की, ५० कोटी लोकांना आजारांवरील उपचारासाठी ५ लाखांच्या संरक्षणाची योजना सरकार सुरू करणार, ही चांगली बाब आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येऊ नये. ही संपत्ती भारतातच राहायला हवी.केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल अर्थसंकल्पात जगातील सर्वांत मोठी सरकारी निधीवरील आरोग्य योजना जाहीर केली होती. देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचे संरक्षण मिळणार आहे.एसजेएमने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि गरिबांचे कल्याण यावर अर्थसंकल्प केंद्रित झालेला होता, ही बाब स्वागतार्ह आहे, असे नमूद करून संघटनेने म्हटले आहे की, शेतकºयांना किफायतशीर भाव मिळायला हवा, अशी मागणी आम्ही फार पूर्वीपासून करीत आहोत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के इतका भाव शेतमालास मिळायला हवा, अशी आमची भूमिका आहे.महाजन म्हणाले की, शेतकºयांना योग्य भाव देण्याची आमची मागणी सरकारने स्वीकारली ही स्वागतार्ह बाब आहे.अर्थसंकल्पात सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना प्रोत्साहन देणाºया अनेक बाबी आहेत, त्याचेही आम्ही स्वागत करतो.

टॅग्स :Healthcare Budget 2018आरोग्य बजेट २०१८Budget 2018अर्थसंकल्प २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत